Corona Series Part 99
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना आणि बेल्ट अँड रोड
२०१३ साला पासून बेल्ट अँड रोड (बिआरआय) चीनचा मोठा महत्वकांक्षी प्रकल्पची सुरवात झाली होती.
प्रामुख्याने चीनची अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून आहे. निर्यात लवकर व्हावी
म्हणून बिआरआयचा प्रकल्प केला आहे. चीनचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. बिआरआयचा
प्रकल्प म्हणजे व्यापाराचे निमित्या सांगून ईतर देशाच्या जमिनी हडप करायची सावकारकी
आहे. चीन कधीच या प्रकल्पाचा उद्देश सांगत नाही त्यामुळे भारत कधीच समर्थन देत नाही.
बिआरआयच्या निमिताने अफ्रीका आणि यूरोप खंड चीनशी जोडण्याचे प्रयत्न केला गेला आहे
जवळपास 70 देश या प्रकल्पाच्या निमिताने चीनच्या सावकारी पाशात अडकले आहेत. कोरोनापूर्वी
पर्यन्त ५४५ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुख्यत: रस्ते, पूल, रेल्वे लाइन या मध्ये गुंतवणूक केली
आहे. प्रगत देशामध्ये देखील मागणी नुसार कमी खर्चात रस्तेबांधून देण्याचे काम चीनने
केले आहे. ही सर्व परिस्थिती चीन ने जगाला दिलेल्या कोरोंना विषाणूच्या आधीची आहे.
कोरोना विषाणूच्या महामारी मुळे जगात
परिस्थिती
बदलू लागली आहे. या महामारीने
जगाला कनेक्टिव्हिटीमुळे झालेले दुष्परिणाम दाखवून दिले आहे. या विषाणूच्या मुळे बिआरआय
सारख्या प्रकल्पाला नक्कीच झळ बसेल. चीनची अर्थव्यवस्थेला देखील फार मोठा फटका बसला
आहे. सध्या आर्थव्यवस्था नकारात्मक प्रगति दाखवत आहे. २०१९ मध्ये देखील ६.१% ग्रोथ रेट असून जानेवारी पासून लॉकडाउन मुळे सारे बंद आहे
त्यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. जगात आयात निर्यात थांबली असल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला
धक्का बसला आहेच तसेच अंतर्गत आर्थव्यव्स्थेमध्ये जून पर्यन्त ५ दशलक्ष नोकर्या चीनी
नागरिकांनी गमावल्या असून डिसेंबरपर्यन्त हा आकडा ९ दशलक्ष होईल असा अंदाज आहे. बेरोजगारीचा
दर ६.२% वर गेला आहे. २०१०ला २०२० साली चीनची जीडीपी दुप्पट करण्याचे एक ध्येय बाळगले
होते परंतु कोरोनामुळे चीन या ध्येयापासून लांब गेला आहे.आत चीन कडे दोन मार्ग सअसणार
आहे एक तर कोरोनाचा विषय संपवुन महासत्ता होणे किंवा चीनी मध्यमवर्गीय नागरिकांचा विचार
करून त्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्याठी प्रयत्न करणे. आपणास आता समजलेच असेल चीनी
कम्यूनिस्ट सरकार कोणता मार्ग स्वीकारत आहेत. अडचणितली अर्थव्यवस्थ घेऊन बिआरआय प्रकल्प
राबवणे चीनला जड जाऊ शकते. कम्यूनिस्ट सरकार या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यासाठी
काशी गळ घालतात हे पाहाव लागेल. कारण या आधीच चीन ने बिआरआय अंतर्गत चीन चे सहयोगी
देशाची अर्थव्यवस्थेवर देखील कर्जाचा बोजा वाढला आहे. पाकिस्तान इकनॉमिक कोरिडोर च्या
माध्यमातून ८.२अब्ज डॉलर चीन गुंतवनुक केली आहे आणि जास्तीचे कर्ज पाकिस्तानच्या डोक्यावर
बसवले आहे. तसेच बांगलादेश वर ३ अब्ज डॉलर. अफ्रीकान देशाची ही तीच हालात आहे. जे देश
बिआरआयचा भाग आहेत ते सर्वच अडचणीत आहेत. हे पाहता चीन सरकार काही कंपनी ज्या कोरोंनामुळे
दिवाळखोरीत आहेत त्यान कर्ज देणार आहे पण त्या काही मोजक्याच कंपनी असतील. शी जिंनपिंग
यांचा स्वत: आखलेल्या १० गोष्टी आहेत ज्या चीनला महासत्ता बनवतील त्यात बिआरआय मधीळ
Terrestial Skil Road
आणि Martim Skil Road हे ८ आणि ९ नंबरवर आहेत. कदाचित चीनच्या अडचणी वाढल्या
तर काही काळासाठी हे प्रकल्पमागे ठेवले जातील. आणि बिआरआयच्या धोरनात बदल घडवले जातिल.
रोड,पूल,रेल्वे लाईन बारोबर 5G तंत्र्ज्ञान या प्रकल्पामध्ये
जोडले जाऊ शकते. कोरोनाच्या पड्यामगे मास्क, मेडिकल डिप्लोमॅसी करत बिआरआयचे धोराण चीन पुढे सरकवत आहे. एकूणच काही कलावधीसाठी
या बिआरआच्या धोरानात बदल केले जातील काही प्रकल्प तात्पुरती स्थगिती दिली जाईल आणि
पुन्हा संधि साधून चीन हे प्रकल्प पूर्ण करेल. जसे भारताने ओळखले आहे हे प्रकल्प देशाच्या
सार्वभौमत्व, स्वातंत्रवर धोका निर्माण करू शकतात
तसे ईतर देशांनी ओळखणे गरजेचे आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Thanks sirr 👍👍 for this information....
ReplyDeleteGreat
ReplyDelete