नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि
काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही
विनंती.
मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे
वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ,
संशोधक, मीडिया, नेते, उद्योजक, आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना
नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया
असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली, पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा
अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले
उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ
लागले. अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी
म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात काही काम
करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण
शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी
आपलाखरीचा वाटा देता येईल का. असा विचार करत असताना वाटले आपल्या बुद्धीला सजून उमगेल
त्या गोष्टी शब्दात मांडूया आणि सोशल मीडियाच्या मार्फत जनजागृती करूया. असे ठरवून
लिहायला घेतले पण नेमके काय लिहावे कसे लिहावे समजत नव्हते तरीही धाडस करून जे वाचनात
येईल आणि मनातून सुचेल तसे मांडू पुढे ठरवू लिखाण पाठवायचे काय नाही. सर्व सामान्य
व्यक्तिला ज्या गोष्टी सुचतील त्याच गोष्टी मलाही सुचल्या फक्त त्या शब्दात मांडण्याचा
प्रयत्न केला. 25 मार्च ला पहिलं लिखाण सुरवातीला फक्त विद्यार्थ्यांना पाठवते. मुलांना
आवडले काहींनी पुढे काय होणार, औषध कधी येणार, कोरोना कधी जाणार, लक्षणे काय असे प्रश्न विचारले. यांचे समाधान करण्यामध्ये लेख मालिका सुरू झाली.
हळू हळू सामाजिक,
आर्थिक स्थितिवर, पर्यावरणवर वर परिणाम दिसू लागले आणि लेख मालिकेत शास्त्रीय
विषया बरोबर सामाजिक,
आर्थिक, पर्यावरण हे विषय आले.
सर्वात महत्वाचे म्हणजे लिखाणाला आपण सर्वांनी दिलेला प्रतिसाद.
लिखाणात वाक्य रचना, वेलांटी
उकारचा चुका असताना मुळ विषय आपणा समजून घेऊन भावार्थ समजून घेतला म्हणूंनच आज 100 भागाची लेखमालिका
पूर्ण केली.
या कोरोनाचा लिखाणामुळे घरात बसूनच बर्याच नवीन लोकांशी संपर्क आला खूप नवीन मित्र
झाले. आर्थिक, वैद्यकीय, पर्यावरण रसायन,
जीव रसायन, जीवशास्त्र, समाजशास्त्रातील बरेच तज्ञ मंडळीशी
संपर्क आला त्यांचाकडून वेलोवेळी सूचना आल्या कशावर भर द्यावा कुठे नको ईत्यादी. मीडिया
हाऊस आणि पोलिस खात्यातील बरेच लोक चांगले मित्र बनले.
अडचणीत आलेल्या वैयक्तिक अर्थव्यवस्थेला व्याखान मालिकेमुळे चालना मिळाली. कोरोनाच्या
बाबतीत वेबिनार, एफडीपी कोर्स मध्ये व्याख्यान देण्यास
आमंत्रित केले गेले.
मनात असताना पण वेळ मिळत नसल्यामुळे
लिखाण केले जात नसे पण लॉकडाउनच्या काळात तोडक मोडक लिखाण करता आले ते फक्त आणि
फक्त आपण सर्वाचे लाभलेले सहकार्य आणि प्रोत्साहन, त्यामुळे याचे सर्व श्रेय वाचकांना माझ्या महाविद्यालयातील सर्व
सहकारी, विद्यार्थी, मित्र, आदरणीय गुरु, आणि माहीत नसणारे सर्वच वाचकांना जाते.
आज जुलैच्या सुरवातीला मार्च महिन्यासारखी परिस्थिती राहिली नाही. कोरोना अजूनही वाढतोय पण वैद्यकीय यंत्रणा सजग झाली आहे
सुधारना ही होत आहेत. सामान्य लोकांना विषयाची खोली लक्षात आली आहे काही अजून सुधारले
नाहीत पण त आहेत असेच राहतील. हीच योग्या वेळ आहे विराम घेण्याची कुठे तरी विराम
देणे गरजेचे असते.
विराम घेतला म्हणजे सगळे बंद झाले असे नाही यापुढे अतिशय महत्वाचे कोरोनावरील शास्त्रीय
संशोधन सर्वसामान्य नागरिकाच्या पर्यन्त पोहोचवण्यासाठी आवशक्यत असेल त्यावेळी कुवती
प्रमाणे लेख लिहून ब्लॉग वर प्रसिद्ध करावा असा विचार आहे. तर मंडळी आपणास विनंती आहे
ब्लॉग वर वेळ मिळेळ तेव्हा या आपण तिकडे भेटू.
पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ
नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
जेंव्हा पासून करोनाणे जगाला विळखा घालण्यास सुरवात केली तेंव्हापासून social मीडिया platform use करून समाजामध्ये
ReplyDeleteत्याबद्दल ची इत्यंमभूत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे डॉ. अजिंक्य पत्रावळे सर!
मनामधल्या प्रत्येक शंकांचे निरसन तसेच सर्व लेखांमधून जनजागृती हे अतिशय महत्वाचे काम त्यांनी केले आहे!
प्रत्येक लेखमधली माहिती ही खप उपयुक्त आणि सहज समजणारी किंबहुना वास्तवाची जाणीव करून देणारी होती तसेच scientific दृष्ट्या अतिशय उपयुक्त होती. तुमच्या सारख्यांची खर तर गरज आहे आजच्या घडीला.
social media च्या माध्यमातून अनेकांना जगाची आणि वर्तमान काळातील बदलेल्या जीवनाची ओळख या निमित्ताने वाचण्यात आली!
खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा💐
डॉ. रेशमा पाटील
करोना आणि जग या बद्दल ची संपूर्ण माहिती आपण त्यांच्या blogspot वरती पाहू शकता!
Thansk gor such great series plz continue the writeing
ReplyDeleteThank u so much sir for such good information.
ReplyDeleteसर,आपण corona series च्या माध्यमातून लोकांना अतिशय चांगली आणि उपयुक्त माहिती दिलीत त्या बद्दल आपले खूप खूप आभार.
ReplyDeleteएखाद्या नवीन विषयाला हात घालताना लागणारे कौशल्य आपल्यात पुरेपूर आहे आणि त्याला मुळातच असणारी आवश्यक subject knowledge ची जोड आहे.
आताच्या सोशल मिडियाच्या जगात लोकांना बरेचदा चुकीची व हलक्या दर्ज्याची माहिती सहजपणे पसरत असते.अशावेळी आपल्यासारखी योग्य व्यक्ती समोर येऊन मौल्यवान माहिती देते ते आताच्या काळात खूप आशादायी आणि महत्वाचे आहे.
शिवाजी लोहार,नावली,पन्हाळा
This information helps us to know all about Covid 19 pandemic tysm sir
ReplyDeleteNice Dr.
ReplyDelete