Corona Series Part 84
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोनामुक्त न्यूझीलँड
जगभरात सर्व देशांमध्ये कोरोनाचा धोका एकाच वेळी होता.
परंतु काही देश या संकटावर लवकर मात करू शकले सध्या काही ठिकाणी हा लढा अजूनही
सुरू आहे एक दिवस ते सुद्धा कोरोनावर विजय मिळवतील आणि म्हणूनच विजय मिळवलेल्या
देशांची विजयगाथा बगितली तर आपल्याला देखील काही गोष्टीचे ज्ञान मिळते आणि आपले
मनोबल वाढते आज ५० लाख लोकसंख्या असणारा न्यूझीलँडची कहाणी पाहू.
भारत आणि न्यूझीलँडया दोन्हीही देशांनी एकाच दिवशी २५ मार्च
२० रोजी आपला देश लॉकडाउन केला आणि ८ जुन रोजी न्यूझीलँड कोरोनामुक्त झाला. भारतामध्ये
एका मोठ्या शहराची लोकसंख्या न्यूझीलँड पेक्षा अधिक असली तरीही भारतातील मोठ्या शहर, गाव कोरोनामुक्त होणे गरजेचे होते अर्थात काही ठिकाणी
घडत आहे. परंतु न्यूझीलँड हा पर्यटनाचा देश आहे भारता पेक्षा आधिक पर्यटक न्यूझीलँड
मध्ये येत असतता त्यामुळे तुलनेने धोका आधिक होतो.
यशाचे श्रेय घेण्यासाठी बरेच असतता परंतु अपयशाचा धनी कोणीही
नसतो असे म्हंटले जात असले तरीही न्यूझीलँडच्या पंतप्रधान मा. जेसिंडा अर्डेन ह्या
मात्र कोरोनामुक्तिचे श्रेय team of 50 Million यांना देऊ केले. सर्व नागरिकानी देशाचे नेतृत्व जे सांगेल
ते मान्य करून त्याची तंतोतंत सूचनाची अंमलबजावणी केली. भारता प्रमाणेच 4 टप्प्याचा
लॉकडाउन न्यूझीलँडमध्ये देखील होता. जागता सर्वच ठिकाणी कोरोनाशी लढण्यासाठी एकच प्रकार
वापरलं परंतु त्याची अंमलबजावणी मात्र वेलग्वेगली होती. २५ मार्च रोजी पहिल्या टप्प्या
मध्ये अंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्यात आल्या सर्व काही थांबव्न्यात आले होते. जैसे
थे परिस्थिति होती. कोरोनाचा सामाजिक प्रसार
होण्याचा संभव होता. पंतप्रधान कार्यालयातून stay in your bubble या टॅग लाइनचे नागरिकांनी तंतोतंत पालन केले. पहिला टप्पा
२६ एप्रिल प्रयत्न अंमलात आणला. २७ एप्रिल पासून दुसर्या टप्पा जो Restrating phaseचा होता. कोरोनाचा विषाणूला अडथळा आणा.
सामाजिक आयुष्य विचार करून जगायची वेळ होती. कडक नियमपाळत शाळा सुरू करण्यात आली प्रत्येक विद्यार्था मध्ये २ मीटरचे अंतर राखणे, सामाजिक अंतर राखणे असे नियम पाळले गेले आणि काही व्यवसाय
देखील चालू केले गेले. Redused phase १३मे
रोजी ३र्या टप्प्यामध्ये चाचणीचे प्रमाण अधिक वाढवून त्याच बरोबर व्यवसायामध्ये अधिकची
सूट दिली. सर्वात महत्वाचे म्हणजे या टप्प्यामध्ये आरोग्य खात्याने भरपूर काम केले.
कोरोनाचे रुग्ण शोधून काढणायत आले आणि योग्य औषध उपचार केले. १०० पेखा अधिक लोकांचे
एकत्रिकरन करण्यास मनाई करण्यात आली. न्यूझीलँडच्या
४थ्या टप्प्या ८ जूनला जाहीर झाला तेव्हा मागील १७ दिवस एकही रुग्ण संपूर्ण न्यूझीलँड
मिळाला नाही आज रोजी सीमा बंद असून बाकी सर्व व्यवहार पूर्वव्रत करण्यात आले. भारतामध्ये
देखील अशी वेळ येणार आहे परंतु लोकसंख्या अधिक असल्यामुळे आणि तांत्रिक, वैद्यकीय गोष्टी मध्ये सुधारणा केल्यास लवकरात लवकर भारत
देखील कोरोना मुक्तिकडे जाईल. पण देश कोरोनामुक्त करायचा असेल तर नागरिकानी आपली जबाबदारी
आपले कर्तव्य आहे असे समजून वागने गरजेचे आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
We are trying our best sir
ReplyDeleteNice information sir 👍👍 thanks 👍👍
ReplyDeleteHope india will be corona free as early as
ReplyDelete