Corona Series Part 68
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना, आणि लक्षद्वीप
कोची
पासून जवळ अरबी समुद्रामद्धे पर्यटनासाठी प्रसिद्ध ३२ स्क्वेर किलोमीटर क्षेत्रफळ
आणि फक्त १.४५लाख लोकसंख्या असणारा बेटांचा समूह जिथे आज पर्यन्त कोरोना विषाणूला प्रवेश
करू शकला नाही. भारतामध्ये या रविवार पर्यन्त सिक्किम, नागालँड, आणि लक्षद्वीप या राज्य आणि केन्द्र्शासित प्रदेशमध्ये कोरोंनाचा शिरकाव
नव्हता. परंतु २४ आणि २५ मे रोजी सिक्किम, नागालँड मध्ये १ रुग्ण सापडला, कोरोना विषाणू भारतामध्ये आल्या पासून आज पर्यन्त
महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त रुग्ण सापडले आजही रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्याचा
खालोखाल केरळ मध्ये रुग्ण होते. केरळ मधून लक्षद्वीपमध्ये रुग्ण वाढण्याची शक्यता
दाट होती परंतु प्रथम केरळने मात्र कोरोना
संक्रमण रोखण्यात यश मिळवले याचा नकळत फायदा लक्षद्वीपला झाला. कष्ट करणार्याला नशिबाची साथ या प्रमाणे लक्षद्वीपमध्ये
देखील प्रशासनांने कडक अंमलबजावणी केली. भारतामध्ये लॉकडाउन घोषित होण्याच्या आधीच
९ मार्च २०२० रोजी परदेशी प्रवासी नागरिकान बंदी करण्यात आली तर भारतीय
नागरिकांना 22 मार्च पासून प्रवास बंदी करण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ
सुंदरवादिवेला यांचा समूहाने आशा, आंगणवाडी ईत्यादि
असामान्य कामगिरी केली. आशा, आंगणवाडी कोरोना योद्धे घरोघरी जाऊन परीक्षण करून
कोरोनासाठी उपयुक्त अशी माहीत संकलित केली. तसेच १९२१ नंबर असणारी हेल्पलाईन चे
काम देखिल सुरळीत चालू होते. लक्षद्वीप
बेट हे आरोग्य सेवेसाठी केरळ वर अवलंबून आहे यामुळे संसर्ग होण्याची शक्यता लक्षात
घेऊन बाहेर जाताना आणि येताना अशी दोन्ही वेळा तपासणी केली गेली. विलगिकरनाची रचने
मधून कोणालाही सूट दिली गेली नाही. सर्वांना सक्ती करण्यात आली होती जारी केरळ मधून
एखादा नागरिक १४ दिवस विलगीकरण पूर्ण करून आला असला तरीही लक्षद्वीप यायचे असल्यास
ईथेही १४ दिवस विलगीकरनामद्धे राहणे सक्ती चे केली गेले. कोरोना व्यतिरिक्त कोणतीही
आरोग्य सेवा घ्याची असल्यास प्राथमिकता ठरवून जहाज किवा चॉपरने त्या व्यक्तीस केरळला
घेऊन जाण्याची सोय केली गेली. ई- जागृत नावाचे ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातूनच ई- पास
ची सोय करण्यात आली. केरळ आणि लक्ष्वदीप या दोन्ही ठिकाणची मान्यता घेणे बंधनकारक होते.
काही नियम आणि अटी जाचक जारी वाटत असल्या तरी त्याची अंमलबजावणी करणे हे अत्यंत महत्वाचे
होते आणि ते केल्यामुळेच आज लक्षद्वीपमध्ये
कोरोंनाचा शिरकाव होऊ शकला नाही. छोट्याश्या केन्द्र्शाशीत प्रदेशाकाढून मोठ मोठ्या
राज्यांनी कोरोंनाशी कसे लढले पाहिजे याचे प्रशिक्षण घेतले पहिजे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग,
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍
ReplyDelete