Corona Series Part 67
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना, आणि ब्राझील
फूटबॉलची पढरी म्हणून जगप्रसिद्ध असणारा देश म्हणजे
ब्राझील. दक्षिण अमेरिका मधील आणि जगामध्ये क्षेत्रफळाचा दृष्टीने 5 व्या स्थानावर
असणारा २१करोड लोकसंखेचा देश. जगाला प्राणवायू देणारा देश अशी ज्याची
ख्याति आहे परंतु ही ख्याति बदलून आता कोरोना विषाणूशी सहज सामना करू शकतो असा अति
आणि फाजील आत्मविश्वास बाळगल्यामुळे कोरोना सोबत चालू असणार्या युद्धामद्धे लोटांगण
घालणारा देश अशी प्रतिमा बनली आहे. सारे विश्व कोरोनामुळे लॉकडाउन जरी असला
तरी ब्राझील मात्र लॉकडाउन झाला नाही उलट जगाची लॉकडाउन करण्याची पद्धत म्हणजे
एखाद्या फ्लू सारख्या विषाणू समोरील ओवर रिएक्शन आहे असे या देशाच्या
पंतप्रधांनानचे मत आहे. कोरोना
ही एक वैश्विक महामारी आहे अश्या निष्काळजी पनाची किंमत ब्राझील भोगतोय परंतु सार्या
जगाला पुन्हा कोरोनाच्या खाईत नेऊ शकतो.
ब्राझीलमध्ये
सध्या कोरणाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहे. आज रोजी ३,९४,५०७ रुग्ण असून २४५९३ मृत्यू झाले आहेत. असाच आकडा वाढत राहिला तर अमेरिकेलाही मागे टाकून ब्रझिल
प्रथम क्रमांकावर पोहोचेल. जास्तीतजास्त तपासण्या झाल्या असतील असे आपणसा वाटू
शकेल परंतु आता पर्यन्त ७ ते ८ लाख तपासन्या झाल्या आहेते भारताचा तुलनेने देखील
या तपासण्या कमी झाल्या आहेत. तरीही रुग्ण संख्या वाढत आहे याचे काय कारणं शोधले तर
ब्राझील सरकारचा फाजील आत्मविश्वास, निष्काळजीपणा, चुकीचे धोरणे या सार्यामुळे ब्राझीलमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. ब्राझीलमधील जवळपास १.३करोड लोकसंख्या
फावेलास (झोपडपट्टी) मध्ये राहते ईथे सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळणे आतिशय अवघड आहे
सामाजिक संसर्ग होण्यास मदत होऊ शकते. तसेच अमेझोन सारखी मोठी नदी शेजारी आदिवासी जमातीचे लोक रहाताता यांचा मध्ये कोरोना
विषाणू बाबतील जनजागृती करणे वेळ खाऊ आणि अवघड काम आहे.
ब्राझीलचे
माननीय पंतप्रधान बोलसेनारोच्या विचारानुसार कोरोना विषाणू म्हणजे एक साधा फ्लूचा
विषाणू आहे त्या साठी सारी अर्थव्यवस्था थाबंवणे गरजेचे नाही. स्वत:ह पंतप्रधान ब्राझीलमध्ये होत
असणार्या लॉकडाउनच्या विरोधात आंदोलन करणार्याच्या काळपात सामील झाले. मंत्रिमंडळातील
सारेच लोक बोलसेनरो सारखे विचार करणारे नाहीत, ब्राझीलचे आरोग्य मंत्री लुईज हेंरिकूए मानिदेत्ता यांना कोरोनामध्ये होत
चाललेल्या गंभीर परिस्थितीचा अंदाज आला असल्याने पंतप्रधानाना सल्ला देण्यास
गेल्यावर पक्षातून काढून टाकण्याची धमकी दिली गेली, आणि पुढे जाऊन केले ही तसेच. आज जगभरातून पंतप्रधानांच्या कार्याची टीका केली
जात आहे याचा नकारात्मक प्रभाव ब्राझीलच्या परराष्ट्राचा संबंधावर पडत आहे. ब्राझीलमध्ये
कोरोंनाचा विळखा वाढला असला तरी येथील सरकार मात्र याचे खपार चीन वर फोडण्यात व्यस्त
आहे पंतप्रधानाचे चिरंजीव चीन विरुद्ध प्रतिक्रिया देत आहे चीन असले आरोप खपून घेत
नाही सर्वज्ञात आहे त्यामुळेच ब्राझीलमधील चीनचे अधिकारी म्हणतात बोलसणारो परिवार म्हणजे
ब्राझीलसाठी एक विष आहे. आरोप प्रत्यरोप करण्याची ही वेळ नाही हे समजण्या ईतके दोन्हीही
देशाचे राजकीय नेतृत्व सक्षम नाही का?
माननिय
पंतप्रधानाचा ब्राझील लॉकडाउन न करण्या मागचा हेतु आपण लक्षात घेतला तर २०१५ साली ब्राझील
मोठ्या आर्थिक अडचीनी मधून नुकताच बाहेर आला आहे २०२० साली ब्राझीलचा विकास दर हा वजा
(-४%) असण्याचा अंदाज वर्तवला जातोय असण्या वेळी लॉकडाउन केला तर विकास दर अजून खाई जाऊन
कोरोना ऐवजी लोक उपासमारी आणि भुकमरी ने मारतील असा विचार करून ब्राझील लॉकडाउन न करण्याचा
निर्णय घेतला गेला. म्हणजेच ब्राझील प्रशासना समोर ईकडे आड तिकडे विहीर अशी
परिस्थिति होऊन बसली आहे. भारत आणि ब्राझील यांचे मैत्रीपूर्ण आणि व्यापारी सबंध राहिले
आहेत. कोरोंना पूर्वी १२ अब्ज
डॉलरचा व्यापार होत असून त्यातील ८ अब्ज डॉलरची भारताकडून ब्राझील आयात करतो. तसेच
२६ जानेवारी २०२० च्या प्रजासताक दिनी बोलसणारो हे प्रमुख पाहुणे होते. भविष्यात देखील
कोरोनाचा प्रभाव पाहता भारताने ब्राझीलचे मार्गदर्शन करणे गरजेचे वाटू लागले आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग,
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
वास्तविकतेचि जाण करून देणारा लेख. काही देशांना अर्थव्यवस्था महत्वाची वाटली म्हणून त्यांनी निर्बंध नाहीत लादले ते आता त्याची फळे भोगत आहेत. आशा करूया जग लवकर यातून बाहेर पडेल.
ReplyDeleteजनजागृती करणारा असा लेख आहे. शुभेच्छा 👍💐
Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍
ReplyDeleteNice information sir thank you so much
ReplyDelete