Skip to main content

Corona Series Part 58 : कोरोना, मिशन सागर, वंदे भारत आणि ऑपरेशन समुद्र सेतु

Corona Series Part 58

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com

 

कोरोना, मिशन सागर, वंदे भारत आणि ऑपरेशन समुद्र सेतु

भारताच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण तीनही दिशेला बंगालचा उपसागर, हिन्दी महासगार, अरबी समुद्र आहे. या समुद्रामध्ये भारताच्या जवळ धोरणात्मक महत्व असणारे बरेचशे छोटे देश, श्रीलंका, मालदिव, श्रीशैल, मोरीशीस, मादागास्कर, कोमरोस ईत्यादी टापू आहेत इथे देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बरेचशे देश हे शेतीप्रधान नाहीत लॉकडाउनमूळे या देशांना होणारी पुरवठा साखळी खंडित झाली आहे. असेच चालू राहिले तर या ठिकाणी कोरोंनापेक्षा उपासमारीचे प्रमाण वाढेल. याचा विचार करून हिंदी महासागरा मधील श्रीशैल, मोरीशीस, मादागास्कर, कोमरोस, मालदिव या आर्कीपेलगो देशांनी भारत सरकारला विनंती केली. भारत नेहमीच या देशांसाठी प्रथम मदतकर्ता ठरला आहे मागील वर्षी देखील डीआरडीओ च्या अंतरगत सागर मैत्री मिशन आखले गेले होते (MAITRI) Marin & Allied Interdisplanry Traning & Research Institute. या ही वेळी देखील ही विनंती मान्य करून परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन समुद्र सेतु आणि मिशन सागर आमलात आणले. या मधील ऑपरेशन समुद्र सेतु हे ऑपरेशन वंदे भारतचाच एक भाग आहे.

मिशन सागरमध्ये आयएनएस-केसरी या नौकेच्या माध्यमातून मालदिव, मोरेशीयससाठी ६०० टन खाद्य पदार्थ, कोरोंनासाठी लागणारयी औषधे, आयुष मंत्रालय मार्फतची विशेष आयुर्वेदिक औषदे, तसेच डॉक्टरयांची टीम. श्रीशैल, कोमरोस, मादागास्करसाठी hydroxichloroquine औषध तसेच डॉक्टरयांची टीमची व्यवस्था केली आहे. अश्या प्रकारे मदत करून भारताला काय सध्या होत असेल हा एक प्रश्न काही लोकांच्या मनात येत असेल. या मदतीमध्ये मानवता हा एक दृष्टीकोण आहेच त्याच बरोबर भारताची सौम्य शक्ति वाडण्यास मदत होते. जागतिक स्तरवर संयुक्त राष्ट्र व ईत्यादि ठिकाणी हे देश भारत एखादा मुद्दा मांडतो तेव्हा भारताचा बाजूने उभे राहू शकतात. ही गोष्ट चीन ला पक्की माहीत आहे त्यामुळे चीनने देखील या देशांना कर्जाचा, बेल्ट अँड रोड ईत्यादी माध्यमातून मादा केली आहे परंतु त्या बदल्यात या छोट्या देशा मध्ये चीन आपली नोसेनाचे स्थानक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते हा धोका ओळखून देखील भारत या देशांना मदत करत असतो. 

वंदे भारत अभियान मधून विविध देशातील १.९०लाख लोकांना भारतता आणले जाणार आहे. या मध्ये विद्यार्थी, खाडी देशातील भारतीय कामगार यांचा समावेश आहे. ७ मे ते १४ मे च्या दरम्यान ६४ विमानातून कतार, सौदी, बांग्लादेश, ओमान, अमेरिका, यूके ईत्यादी देशातून १४,८०० लोकांचे स्थलानतरण केले गेले. या मध्ये भारतीय विमान सेवा देणारी एयर इंडिया च प्रमुख सहभाग आहे त्याच बरोबार भारतीय हवाई सेनेचे super Herculas C130J, Globemaster या विमाचा वापर केला जाणार आहे. विविध देशातील दूतावास मार्फत यादी करण्यात आली आहे. विशेष करून ज्या लोकांच्या घरात मृत्यू झाला असेल, गर्भवती स्त्रिया, ज्या कामगारांची कोरोनामुळे नोकरी गेली आहे आणि विद्यार्थी विसा संपलेले याना प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु प्रवास करताना भारत सरकारने बनवलेले मार्गदर्शक तत्वे तंतोतंत पाळावी लागणार आहे जसे आरोग्य सेतु वापरणे, सपूर्ण चाचणी केली जाणार आहे लक्षणे असतील तर प्रवास बंदी केली जाणार आहे. त्याच बरोबर या लोकांचे विलगिकरण करण्यात येणार आहे. या प्रवासासाठी आणि विलगिकरण मध्ये राहण्यासाठी या लोकांना पैसे मोजावे लागणार आहे त्याचे कारण असे की बर्‍याच राज्य सरकारांनी घरी विलगिकरण करण्याचा विरोध केला. या मुळे आलोचना देखील झेलावी लागली कारण खाडी देशातील कामगार आणि विद्यार्थी परदेशी कमवा आणि शिका योजनेत होते त्यांच्यावर आधीच आर्थिक संकट ओढावले आहे. परंतु कोरोंनाचे संकट पाहत लोक भारतता येत आहे हेच अधिक आहे. जसे भारतातिल लोक भारता बाहेर आहेत तसे भारतता असणारे परदेशी लोकांना देखील त्यांचा देशात त्या देशाचा समती नंतर सोडण्यात येणार आहे.

ऑपरेशन समुद्र सेतुच्या माध्यमातून मालदिव मध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना भारतात आणणे हे उदीष्ट समोर ठेऊन आयएनएस-जलश्व, आयएनएस-मगर, या नौका मधुन ७५० भारतीयांना भारतात आणले. मालदिव मध्ये २०,००० पेक्षा अधिक भारतीय लोक आहेत परंतु या ऑपरेशन च्या मधमातून प्रवासी, आणि आर्थिक अडचणीत असणारे भारतीय प्रवास करणार आहेत. आयएनएस-जलश्व नौकेची क्षमता १७,५२१ टन असून ही अमेरिकन बनावटीची आहे. अमेरिका देखील हे नौका वापरते भारतीय नोसेना मध्ये २००५ साली वापरात आणली गेली. तसे पाहत या नौकेची क्षमता अधिक आहे परंतु सध्या कोरोंनाच्या काळात सामाजिक अंतर राखत प्रवास करणे गरजेचे आहेत याचा विचार नौसेने केला आहे आपणास माहीत असेल भारतीय नोसेनेचा दर्जा उच्च आहे या अनुसरून या नौकेत वैद्यकीय सहायता कक्ष, लॅब, दाताचा दवाखाना, आणि ४ ऑपरेशन थेटर आणि नौका निर्जंतुक केली गेली आहे. या मनाने मगर नौका भारतीय बनावटीची असून १९८७ पासून भारतीय नोसेनेत सेवा बजावत आहे. याची क्षमता ५,५७०टन ईतकी आहे.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

https://ajinkya1030.blogspot.com

 


ajinkya1030.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...