Skip to main content

Corona Series Part 42 : कोरोना, आणि सामाजिक वर्तुळाची निर्मिती

Corona Series Part 42
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोना, आणि सामाजिक वर्तुळाची निर्मिती

मानवाच्या उत्क्रांतीच्या काळापासून आधुनिक मानवा पर्यन्तच्या प्रवासात मानव जातीत बरेच बदल घडत गेले, परंतु काही बाबतीत अजूनही साधर्म आहे, जंगलात राहतान मानवाला कळपात राहण्यास आवडे आणि आजही लोकांनमध्ये मिळून मिसळून राहायला मानव जास्त पसंती देतो व आपले सामाजिक वर्तुळ तयार करतो. या लॉकडाउनमुळे हे सामाजिक वर्तुळाचे आकुंचन झाले. त्यात देखील बरेच लोक आपल्या कुटुंबापासून दूर गावी अडकले आहेत आणि म्हणूनच त्यांना एकटेपणाची जाणीव होऊन आपल्या कौटुंबिक वर्तुळामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जे कुटुंबामध्ये आहेत ते कुटुंबासोबात सकारात्मक वेळ देत आहेत. काही आहे तिथे थांबण्याची मानसिकता करून नवीन वर्तुळामध्ये सामावून जात आहेत.
बदलत चाललेल्या संस्कृतीमुळे काही ठिकाणी कौटुंबिक वर्तुळामध्ये राहणे नकोसे झाले आहे. वर्क फ्रॉम होम सांभाळत मुलांना शिकवणे त्यांचा अभ्यास (शाळा कॉलेज बंद), लहान मुलाना खेळण्यास बंदी बाहेर जाण्यास मनाई, घरातील मोठ्या लोकांची सेवा, घरकाम, काही ठिकाणी नात्यांमद्धे निर्माण झालेले सोशल डिस्टन्स मोडून क्वारनटाईन झाल्यामुळे बर्‍याच रहस्यमय कथा उलघडत आहेत त्यातून पुढे isolation ची वेळ येऊ शकेल. अशी कधी न केलेल्या कामा सोबत करमणुकीच्या सगळ्या गोष्टी बंद आहेत (Pub, Resto, travel, Movi, bar, etc). या मुळे सामाजिक, मानसिक आरोग्याचे विषय समोर येऊ लागले आहेत.  अश्या दोन्ही बाजू असल्या तरी प्रत्येक व्यति स्वतचे असे सामाजिक वर्तुळ बाळगतो, त्यात कोण असावे कोण नसावे हे तो स्वत: ठरवू शकतो. परंतु या कोरणामुळे हे सामाजिक वर्तुळ कसे असावे, कुणा सोबात आसवे अश्या गोष्टी जर सरकार ठरवणार असेल तर आपणास रूचणार नाही. परंतु जगात काही देशातील सरकारे काही दिवसासाठी असे कठोर निर्णय घेणायचा विचारानभूत आहे.
न्यूझीलंड देशात मागील ३ दिवसात १ ही कोरोंनाचा रुग्ण आढळून आला नाही. आता पर्यन्त १४७९ बाधित तर फक्त १९ मृत्यू झाले आहेत. या देशात ही आधुनिक तंत्रज्ञान, योग्य वेळी लॉक डाउन, अधिक तपासणी आणि मर्यादित लोकसंख्या ईत्यादी जमेच्या बाजू ठरल्या, महाराष्ट्रा मधील नागपुर जिल्हाची लोकसंख्या (४६-४७ लाख) ईतकी संपूर्ण न्यूझीलंड देशाची लोकसंख्या (४६ लाख) आहे. न्यूझीलंड कोरोना मुक्त झाले नसले तरी सामुदायिक हस्तांतरण थांबले आहे म्हणून मा.पंतप्रधान Jacinda Ardern यांची जागतिक स्थरावर प्रशंसा केली जाता आहे. कोरोना नियंत्रणात आल्यामुळे आता लॉकडाउन शीथिल करून यातून बाहेर पडण्याची नियोजन चालू झाले आहे. त्यासाठीची योजना आखताना पंतप्रधानानी सामाजिक वर्तुळाचा उल्लेख केला.  लॉकडाउन शीथिल करताना कोरोनाची दुसरी लाट येऊ नये याचा विचार करून ठराविक अटी समाजावर लादण्यात येणार आहे.
सरकारला आपल्या सार्वजनिक उपक्रम कळवून मंजूरी घ्यावी लागेल. आपल्या शहरातील १० लोकांची नावे कळवावी लागतील ज्यांना सोबात आपण लॉकडाउन नंतर मिळून मिसळून राहू शकाल. या लोकांच्या व्यततिरिक्त आपण कुणालाही भेटू शकणार नाही. शहराच्या बाहेर प्रवास करता येणार नाही. आपले आई, वडील आपल्या सोबत नसतील तर त्यांना देखील आपल्याला ठराविक नियम, अटीचे पालन कारून भेट घेता येईल. आता आपल्या सामाजिक वर्तुळा मधील १० लोकांची नावे कळवने किती प्रश्नांना तोड फोडू शकेल मित्र, नातेवाईक, शेजारी, ऑफिस मधील सहकारी, मुलांचे दोस्त, आपले स्वतःचे की बायको कडचे असे कोणत्या लोकांची यादी करणार एकाचे नाव घेतले तर (प्रत्येक्ष किवा अप्रत्येक्ष) दूसरा नाराज.
ऑस्ट्रेलियाचे मा. पंतप्रधानानी ट्रान्स- टसमान प्रवासी वर्तुळ निर्माण करण्यात यावे असे म्हंटले आहे. म्हणजे न्यूझीलंड –ऑस्ट्रेलिया मधील नागरिक ठराविक ठिकाणीच पर्यटनासाठी व्यापारासाठी जाऊ शकतील ईतर कुठे नाही. ठराविक काळासाठी असे कठोर पाऊल उचलावे लागत आहे, असाच लॉकडाउन शिथिल कारण्याचा न्यूझीलंड सारखा विचार स्कॉटलंड, बेल्जियम सारखे यूरोपियन देश करत आहेत. कॅनडा मध्ये २ कुटुंबाचे वर्तुळ निर्माण केल आहे.
असा विचार भारतात करणे शक्य आहे का ! वरील सर्व देश हे लोकसंखेच्या मानाने छोटे आहेत तिथिल तंत्रज्ञान, संस्कृती, राहणीमान सर्वच वेगळे आहे. भारतीय नागरिकांचे सामाजिक आणि कौटुंबिक वर्तुळ खूपच मोठे आहे. लॉकडाउन नंतर भारतीय समाजाला अश्या आकुंचीत सामाजिक वर्तुळामध्ये बाधून ठेवने शक्य नाही. परंतु भारतीय नागरिकांनी समजून घेऊन, पुढे काही काळ स्वत:च्या मनाशी पक्का विचार करून गरजे पुरता आपले सामाजिक वर्तुळ मर्यादित ठेवले तर असे नियम व अटी घालाव्याच लागणार नाही. या व्यतिरिक्त दुसरी पर्याई व्यवस्था शोधून काढली पाहिजे.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...

Corona Series Part 100 : कोरोना आणि DRDO

Corona Series Part 100 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि DRDO १९५८ मध्ये तांत्रिक विकास संस्था आणि भारतीय आयुध निर्मिती संचालनालयाच्या संरक्षण विज्ञान संस्थेमध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) जी लष्कराच्या संशोधन आणि विकासाची संस्था आहे. एकूण ५२ प्रयोगशाळां , ज्याद्वारे एरोनॉटिक्स , आर्मेट्स , इलेक्ट्रॉनिक्स , लँड कॉम्बॅट इंजिनिअरिंग , जीवन विज्ञान , साहित्य , क्षेपणास्त्रे आणि नौदल प्रणाली अशा विविध क्षेत्रांचा समावेश असलेले संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेले आहे. या संघटनेत संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (डीआरडीएस) चे सुमारे ५ , ००० शास्त्रज्ञ आणि इतर २५ , ००० वैज्ञानिक , तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. अशी नावा रूपाला आलेली लष्करी संस्था कोरोंना सारख्या महामारीत देखील देशसेवेचे आपले...