Corona Series Part 34
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देश
पूर्ण विश्व या कोरोनाने व्यापले जरी असले तरी एक ना एक
दिवस महामारीचा प्रभाव कमी होत जाणार आहे. आपल्या electronic साधनामध्ये (mobile) formate नावाचा पर्याय असतो. तो पर्याय निवडला की सगळं निघून जात
आणि पुन्हा नव्याने विकत घेतलेल्या प्रमाणे ते साधन होऊन बसत. त्या प्रमाणे या
महामारीमद्धे विश्वाचे जणू काही formatting चालू
आहे. एकदा हे झाले की पुन्हा नव्याने उद्योग जगताला reset करावे लागणार आहे. त्यामुळे या वैश्विक महामारीच्या निमिताने चीनमधील
उद्योगाचे भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देशात स्थलांतरण होत आहे. भारताचा विचार करताना
नव्याने तयार होणार्या स्पर्धेत भारताने जास्तीत जास्त उद्योगधंदे भारतानं
आणन्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी
स्थालांतरीत होणार्या कंपण्यानचा कल कोणत्या भौगोलिक क्षेत्राकडे का आहे हे
लक्षात घेतले पाहिजे. त्यांना भारतता आण्यासाठी काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे त्या वर आज आपण
एक दृष्टीक्षेप टाकुया.
जगात सगळीकडेच व्यापारयुद्ध चालूच असते. व्यापाराच्या
दृष्टीने भविष्यात चीन जसा पुरवठा साखळीचा प्रमुख झाला आहे तसा कोणताही देश पुरवठा
साखळीचा मालक होता कामा नये, अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स च्या सर्वे नुसार बरेचसे उद्योगधंदे
भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देश जसे थायलंड, विएतनाम, सिंगापूर, मलेशिया, इंडोंनेशिया ई देशाकडे आशेने पाहत आहेत.
या देशांना झुकते माप देण्याची काही कारणे आहेत.
भौगोलिक जवळीकता :
चीन मधून एकदमच सगळे उत्पादन स्थलांतरित करता येणार नाही. काही
गोष्टींसाठी सर्व कंपन्यांना यानंतर ही चीनवर अवलंबून राहावे लागणार आहे तेव्हा चीन
पासून दक्षिणपूर्व आशियाई देश जवळ असल्याने वाहतूक जास्त करावी लागणार नाही. चीनमध्ये
Shenzhen नावाचे उत्पादन केंद्र आहे त्याच प्रकारचे
विएतनाममध्ये Ho Minch
chi नावाचे उत्पादन
केंद्र मुळातच उपलब्ध आहे त्यामुळे नवीन सुविधा पुन्हा शून्यातून निर्माण करन्याची
आवशक्यता नाही.
पायाभूत. सामाजिक सुविधा :
विएतनाम, थायलंड मध्ये पायाभूत
सुविधा भारतापेक्षा आधिक चांगल्या पद्धतीने अस्तीत्वात आहेत. विविध कंपन्या स्थापन
होत असताना शिक्षण,
आरोग्यच्या सुविधा देखील छगल्या असव्या
लागतात. भारत आपल्या nominal
जीडीपीच्या ७.५% रक्कम शिक्षण आणि आरोग्यच्या
सुविधा पुरवण्यावर खर्च करतो तर विएतनाम मात्र ७.५% रक्कम फक्त आरोग्यच्या सुविधा पुरवण्यावर
खर्च करतो. १९९१ला ज्या पद्धतीचे बदल भारतता झाले त्याच पद्धतीचे बदल विएतनाम १९८६
पासून Doi-moi
पॉलिसी अंतर्गत करण्यात आले आहेत. या
मुळे छोट्या अर्थव्यवस्था असताना देखील पुष्कळ कंपन्या भारतापेक्षा दक्षिणपूर्व
आशिया देशांना जास्त महत्व देत आहेत. भारताने अश्या सुविधा आता अधिक पुरवायला सुरवात
केली तर या कंपन्यांच्या ओढा भारताकडे नक्कीच राहील.
उत्पादनातील साम्यता :
चीन ज्या प्रकारचे आणि ज्या पद्धतिचे उत्पादन करतो आणि निर्यात
करतो. त्याच पद्धतीचे उत्पादन आणि निर्यात करण्यात विएतनाम (५०%) अव्वल स्थानावर आहे.
भारत जावपास ५ व्या (४०%) स्थानावर आहे.
व्यवसाय करण्यातील सुलभता :
Ease of doing business या बाबतीत मात्र २०१८-च्या तुलनेत भारत विएतनाम, थायलंड किवा अन्य दक्षिणपूर्व आशियाई देशांच्या पुढे आहे.
२०१८ साली ७७ स्थानावरून २०१९ साली ६३ स्थानावर आला आहे. या उलट विएतनाम मात्र ६९ वरुण
७०व्या स्थानावर पोहोचला आहे. नवीन व्यवसाय स्थापन करणे करिता भारतात जावपास १२ प्रक्रिया
पूर्ण कारवया लागताता त्या साथी २७ दिवस ईतका कालावधी लागतो.
चलन विनिमय दर :
१९४७ आणि त्यानंतर काही काळ भारताचे चलन निश्चित विनिमय दर या प्रमाणे निश्चित
राहायचे. परंतु आता आपण बदलती विनिमय दरप्रणाली वापरत आहोत. त्यामुळे भारतीय चलनाचा
दर खाली येईल तेव्हा परकीय गुंतवणूक असणार्या कंपन्यांच्या फायद्यामध्ये घट होऊ शकते.
या उलट विएतनाम मध्ये crawling विनिमय
दरप्रणाली वापरली जाते या कारणाने त्याचे चलन स्थिर राहते यामुळे कंपन्यांना दूरगामी
फायदा होतो.
स्थलांतरीत होणार्या काही कंपनी आणि देश
1]
Hardly Devidson, Merry Electronic Thailand
2]
Hasbro, Skechers, Foxconn Viatnam
or India
3]
Procon Pacific India
4]
Samsung, Ninterndo, Goertek Viatnam
वरील
सर्व गोष्टींचा विचार केला असता दक्षिणपूर्व आशियाई देशांत भारतापेक्षा जास्त उद्योगधंदे
स्थलांतरीत होत असले तरी या सगळ्या देशांचा मानाने आपणही बरी प्रगति करत आहोत असे मानायला
काही हरकत नाही.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
ajinkya1030.blogspot.com
Comments
Post a Comment