Skip to main content

Corona Series Part 34 : कोरोना, भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देश


Corona Series Part 34
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोना, भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देश
पूर्ण विश्व या कोरोनाने व्यापले जरी असले तरी एक ना एक दिवस महामारीचा प्रभाव कमी होत जाणार आहे. आपल्या electronic साधनामध्ये (mobile) formate नावाचा पर्याय असतो. तो पर्याय निवडला की सगळं निघून जात आणि पुन्हा नव्याने विकत घेतलेल्या प्रमाणे ते साधन होऊन बसत. त्या प्रमाणे या महामारीमद्धे विश्वाचे जणू काही formatting चालू आहे. एकदा हे झाले की पुन्हा नव्याने उद्योग जगताला reset करावे लागणार आहे. त्यामुळे या वैश्विक महामारीच्या निमिताने चीनमधील उद्योगाचे भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देशात स्थलांतरण होत आहे. भारताचा विचार करताना नव्याने तयार होणार्‍या स्पर्धेत भारताने जास्तीत जास्त उद्योगधंदे भारतानं आणन्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी स्थालांतरीत होणार्‍या कंपण्यानचा कल कोणत्या भौगोलिक क्षेत्राकडे का आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांना भारतता आण्यासाठी काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे त्या वर आज आपण एक दृष्टीक्षेप टाकुया.
      जगात सगळीकडेच व्यापारयुद्ध चालूच असते. व्यापाराच्या दृष्टीने भविष्यात चीन जसा पुरवठा साखळीचा प्रमुख झाला आहे तसा कोणताही देश पुरवठा साखळीचा मालक होता कामा  नये, अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स च्या सर्वे नुसार बरेचसे उद्योगधंदे भारत आणि दक्षिणपूर्व आशिया देश जसे थायलंड, विएतनाम, सिंगापूर, मलेशिया, इंडोंनेशिया ई देशाकडे आशेने पाहत आहेत. या देशांना झुकते माप देण्याची काही कारणे आहेत.
 भौगोलिक जवळीकता :
चीन मधून एकदमच सगळे उत्पादन स्थलांतरित करता येणार नाही. काही गोष्टींसाठी सर्व कंपन्यांना यानंतर ही चीनवर अवलंबून राहावे लागणार आहे तेव्हा चीन पासून दक्षिणपूर्व आशियाई देश जवळ असल्याने वाहतूक जास्त करावी लागणार नाही. चीनमध्ये Shenzhen नावाचे उत्पादन केंद्र आहे त्याच प्रकारचे विएतनाममध्ये Ho Minch chi नावाचे उत्पादन केंद्र मुळातच उपलब्ध आहे त्यामुळे नवीन सुविधा पुन्हा शून्यातून निर्माण करन्याची आवशक्यता नाही.
पायाभूत. सामाजिक सुविधा :
विएतनाम, थायलंड मध्ये पायाभूत सुविधा भारतापेक्षा आधिक चांगल्या पद्धतीने अस्तीत्वात आहेत. विविध कंपन्या स्थापन होत असताना शिक्षण, आरोग्यच्या सुविधा देखील छगल्या असव्या लागतात. भारत आपल्या nominal जीडीपीच्या ७.५% रक्कम शिक्षण आणि आरोग्यच्या सुविधा पुरवण्यावर खर्च करतो तर विएतनाम मात्र ७.५% रक्कम फक्त आरोग्यच्या सुविधा पुरवण्यावर खर्च करतो. १९९१ला ज्या पद्धतीचे बदल भारतता झाले त्याच पद्धतीचे बदल विएतनाम १९८६ पासून Doi-moi पॉलिसी अंतर्गत करण्यात आले आहेत. या मुळे छोट्या अर्थव्यवस्था असताना देखील पुष्कळ कंपन्या भारतापेक्षा दक्षिणपूर्व आशिया देशांना जास्त महत्व देत आहेत. भारताने अश्या सुविधा आता अधिक पुरवायला सुरवात केली तर या कंपन्यांच्या ओढा भारताकडे नक्कीच राहील.
उत्पादनातील साम्यता :
चीन ज्या प्रकारचे आणि ज्या पद्धतिचे उत्पादन करतो आणि निर्यात करतो. त्याच पद्धतीचे उत्पादन आणि निर्यात करण्यात विएतनाम (५०%) अव्वल स्थानावर आहे. भारत जावपास ५ व्या (४०%) स्थानावर आहे.
व्यवसाय करण्यातील सुलभता :
Ease of doing business या बाबतीत मात्र २०१८-च्या तुलनेत भारत विएतनाम, थायलंड किवा अन्य दक्षिणपूर्व आशियाई देशांच्या पुढे आहे. २०१८ साली ७७ स्थानावरून २०१९ साली ६३ स्थानावर आला आहे. या उलट विएतनाम मात्र ६९ वरुण ७०व्या स्थानावर पोहोचला आहे. नवीन व्यवसाय स्थापन करणे करिता भारतात जावपास १२ प्रक्रिया पूर्ण कारवया लागताता त्या साथी २७ दिवस ईतका कालावधी लागतो.
चलन विनिमय दर :
१९४७ आणि त्यानंतर काही काळ भारताचे चलन निश्चित विनिमय दर या प्रमाणे निश्चित राहायचे. परंतु आता आपण बदलती विनिमय दरप्रणाली वापरत आहोत. त्यामुळे भारतीय चलनाचा दर खाली येईल तेव्हा परकीय गुंतवणूक असणार्‍या कंपन्यांच्या फायद्यामध्ये घट होऊ शकते. या उलट विएतनाम मध्ये crawling विनिमय दरप्रणाली वापरली जाते या कारणाने त्याचे चलन स्थिर राहते यामुळे कंपन्यांना दूरगामी फायदा होतो.
 स्थलांतरीत होणार्‍या काही कंपनी आणि देश
1] Hardly Devidson, Merry Electronic       Thailand
2] Hasbro, Skechers, Foxconn             Viatnam or India
3] Procon Pacific                         India
4] Samsung, Ninterndo, Goertek           Viatnam                     
वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता दक्षिणपूर्व आशियाई देशांत भारतापेक्षा जास्त उद्योगधंदे स्थलांतरीत होत असले तरी या सगळ्या देशांचा मानाने आपणही बरी प्रगति करत आहोत असे मानायला काही हरकत नाही.


प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
ajinkya1030.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...