Skip to main content

Corona Series Part 10 : लॉक डाउन आणि स्थलांतरित होणारी कुटुंब


Corona Series Part 10
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. काल आपण मध्यवर्गीय आणि लॉक डाउन ह्या बाबतीत लिहिला ते लिहत असतानाच विचार येत होता दारिद्र रेषेच्या खाली असणार्‍या लोकांचं काय! आज थोडासा विचार करू

लॉक डाउन आणि स्थलांतरित होणारी कुटुंब

नव्या नवरी चे 9 दिवस अस बोली भाषेत म्हंटलं जात. 23 मार्च पासून लॉक डाउन सुरू झाला आणि दारिद्र रेषेच्या खाली असणार्‍या लोकांच्या अस्तित्वाची लढाई अधिक अधिक कठीण झाली. सुरवातीच्या 22 ते 26/27 मार्च पर्यन्त मोठ्या शहरकडून गावंकडे जाण्याचं ओढा इतका नव्हता जो की काल आणि आज दिसत आहे त्याचा कारण वर सागीतलेल्या म्हणी मधी आहे. लॉक डाउन मध्ये आपल्या हाताला काम मिळणार नाही आपला रोजचं काम सोडून इतर काही धंदा नोकरी करता येणार नाही ह्याची जाणीव मागील 2 दिवसात प्रकर्षाने जाणवू लागली (सुरवातीच्या काळात काही लोक गेले ते वेळेपूर्वी शहाणे झाले) सुरवातीचे 2,4 दिवस परिस्थिति च आढाव घेण्यात आणि पोलिस, सरकारी यंत्रान चा अंदाज घेण्यात गेली कदाचित पोलिस आणि सरकारी यंत्रान ह्या लॉक डाउन मध्ये इतकी कडक भूमिका घेतील अस काहीसं ह्या वर्गाला वाटल नसाव पण आपल्याल ह्या मोठ्या शहरामद्धे आता पुढचे 21 दिवस काम मिळणार नाही, काही खायला देखील मिळणार नाही हे समजल्यावर पोत्यात बेसल तेवड साहित्य डोक्यावर घेऊन ही लोक सपूर्ण कुटुंब सोबत चालत 500 ते 1000 किलोमीटर च प्रवास करावयास निघाली आणि ज्यासाठी लॉक डाउन करावा लागला (Mass Gathering टाळण्यासाठी) त्या यंत्रणेचा चुथडा झाला. हवडा रेल्वे स्थानकावर किवा दिल्ली असो वा मुंबई हजारो लोक गावी जाण्याची धडपड करताना दिसतात. दिल्ली मधुन उत्तर प्रदेश साठी १००० बस सोडण्यात आल्या, एक न्यूज पेपर च्या माहिती नुसार राजस्थान मधल्या 26 लाख लोकसंखा असणार्‍या एका छोट्या शहरात काल एका दिवशी 17,800 लोक आले आहेत आणि त्यांच स्क्रीनिंग करण्यात आल आहे. अर्थात ह्यात काय फक्त त्या लोकांची आणि सरकारला दोष देऊन उपयोग नाही. प्रमुखाने त्याचीही काही कारणं आहेत.
1] भारतात झालेले औद्योगीकरण विषम आहे प्रत्येक राज्यात एक सारखा औद्योगीकरण झालेल नाही सर्वात जास्ती औद्योगीकरणामद्धे महाराष्ट्र अव्वल आहे त्यानंतर, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटका, तमिळनाडू, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, असे आहे. कश्मीर आणि नॉर्थ ईस्ट मध्ये मात्र औद्योगीकरण फारसे दिसत नाही ह्या मुळे वर्षभर कामाचा शोधात हे लोक मोठ्या शहरात राज्यात स्थलांतरित होत राहतात. आताच्या ह्या लॉक डाउन मध्ये पूर्णपणे बंद झालेला इन्कम सोर्स.  
2] इन्कम सोर्सच बंद होणार असेल तर गावाकडे जाण्याची ओ,  ही ओढ निर्माण होणे साहजिक आहे कारणं माणूस हा भावनिक असतो.  
३] कामा निमित्या स्थलांतरचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. i) Inter District 62% ii) Between two District 26% iii) Between two Stats 12% आज रस्त्यावर दिसत आहेत ते प्रामुख्याने ii) 26% आणि iii)12% मधील जनता आहे. टक्केवारी मध्ये हा आकडा मोठा वाटत जरी नसला तरी 12% म्हणजे जवळपास 14 करोड लोक होतील आणि 2011 च्या आकडेवारी नुसार जवळपास 3 करोड लोकसख्या (labor) ही दारिद्ररेषेच्या खालील आहे. जर एवढी प्रचंड गर्दी जर रस्त्यावर येणार असेल तर आपला लॉक डाउन २१ दिवसात संपणार आहे का आणि मुळात तो यशस्वी होणार आहे का. त्यासाथी spice jet सारख्या काही विमानसेवा देणार्‍य कंपनी ने सरकार कडे निवेदन दिले आहे की रस्त्यावर असणार्‍या जनतेला काही तासात आम्ही त्यांचा गावी पोहोचवू पण ह्या वर अजून निर्णय झाला नाही.  
3] देशावर आलेल हे संकटा मधली अनिश्चितता, कारण हा लॉक डाउन किती दिवसा चालणार आहे हे प्रशासन आता सागू शकत, प्रशासनच काय कोणीच सांगू नाही शकणार.
जर आपण लॉक डाउन ची पूर्वा कल्पना दिली असती तर हा ताण कामी झाला असतता लोक आपल्या गावी गेली असती पण आपली इटली सारखी अवस्था झाली असती. तिथे मीडियाने सूत्र चा माध्यमातून बातमी लिक केली आणि लोक इन्फेकशन घेऊन सपूर्ण इटली मध्ये पसरले. २३ मार्चला लॉक डाउन झाल्या मुळे फक्त काही % लोक (काही हजार) हे आता रस्त्यावर दिसत आहेत ह्या स्थांनातरीत होणार्‍या लोकांना विनती आहे की त्यांनी स्वतहून स्वतच्या घरी Home Quarantine होण गरजेचं आहे. जेव्हा ते एखाद्या राज्यात प्रवेश करतील तेथील सरकारी यंत्रना आता सज्ज झाली आहे त्याच स्क्रीनिंग करून घ्यायला.
 केंद्र सरकारने ह्या दारिद्ररेषेच्या खालील लोकांसाठी 5 किलो धान्य दरमहा जादा द्यायची व्यवस्था केली आहे. तसेच राज्य सरकरांना 28,000 करोड रुपयाचा State Disaster Response Fund (SDRF Fund) वापरणायची मुभा दिले आहे. तसेच PM- CARE ह्या नावाने वेगळा निधि उभा करण्याचे काम चालू केल आहे.
सांगायचा मुदा इतकाच आहे की आज हातावरच पोट असणार्‍या व्यक्तींनी (panic), घाबरून न जाता जवळील प्रशासनाला मदत करा, संयम राखा, तुमच्या अडचणी प्रशासनाला सांगा, प्रशासनाला नियोजन करून तुमची मदत करायला वेळ द्या तोपर्यंत संयम राखा, अस रस्त्यावर येऊन तुम्ही एक तर कोरोंना पसरवाल आणि कोरोंना मुळे नाही तर मग उपासमारी मुळे गतप्राण व्हाल. 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Popular posts from this blog

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...

Corona Series Part 100 : कोरोना आणि DRDO

Corona Series Part 100 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि DRDO १९५८ मध्ये तांत्रिक विकास संस्था आणि भारतीय आयुध निर्मिती संचालनालयाच्या संरक्षण विज्ञान संस्थेमध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) जी लष्कराच्या संशोधन आणि विकासाची संस्था आहे. एकूण ५२ प्रयोगशाळां , ज्याद्वारे एरोनॉटिक्स , आर्मेट्स , इलेक्ट्रॉनिक्स , लँड कॉम्बॅट इंजिनिअरिंग , जीवन विज्ञान , साहित्य , क्षेपणास्त्रे आणि नौदल प्रणाली अशा विविध क्षेत्रांचा समावेश असलेले संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेले आहे. या संघटनेत संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (डीआरडीएस) चे सुमारे ५ , ००० शास्त्रज्ञ आणि इतर २५ , ००० वैज्ञानिक , तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. अशी नावा रूपाला आलेली लष्करी संस्था कोरोंना सारख्या महामारीत देखील देशसेवेचे आपले...