Corona Series Part 101
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना आणि G4 विषाणू
जवळपास महिनाभराच्या अंतराने आज पुन्हा थोडा लिहावास वाटल.
महिन्याभराच्या कलावधीत बरच पाणी पुलाखालून वाहून गेले कोरोना विषाणू त्याची लस
जागतिक याबादल जागतिक घडामोडी झाल्या. ग्लोबल कोरोना आता घरच्या शेजार पाजारी येऊन
ठेपला. कोरोना विषाणू उन्माद कमी होणारा नाही याचा अंदाज होताच पण रोज मरे
त्याला कोण रडे अशी या कोरोना ची अवस्था झाली आहे. म्हणून लेख लिहायचे कामास
दुसरे प्राधान्य ठेवून वाचकाची भूमिका स्वीकारली राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय, स्थानिक वृतपत्राचे वाचन आणि इंटरनेट च्या माध्यमातून काय चालू आहे ह्यावर
लक्ष होतेच म्हंटलं योग्य वेळ आली की वाचनाच्या भूमिकेतून लिखाणाच्या भूमिकेत
जाऊया.
साधारत: कोरोना विषाणूच्या काळात नव नवीन विषाणू ची साथ येऊ
लागली आहे. याडा-याडा,
हंटा विषाणू ईत्यादी महिन्याभरापूर्वीच
स्वाइन फ्लू च्या कुटुंबामध्ये नव्याने जन्माला आलेला जी४-ईए-एच१एन१ फ्लूचा विषाणू
पुन्हा चीन मधेच पसरल्याचे वृतंसमोर आले आणि पुन्हा एकदा चिंता वाढली. चिंता वाडण्याचे
कारण आहेच कारण चीन आणि अमेरिका या दोन्ही देशामधील शास्त्रज्ञांनी संशोधणं करून अहवाल
सादर केला आहे. Proceeding
of National Academy of Science USA यांचा संकेतस्थळावर हा अहवाला आहे यानुसार जी४-ईए-एच१एन१ हा सुधारित विषाणू असून
सध्या डुक्करानपासून मानवात पोहोचत आहे. अभ्यासानुसार
या विषाणूवर योग्य संशोधन आणि काळजी घेतली नाही तर कोरोना सारखा हा देखील मनुष्यमार्फत
समाजामध्ये पसरू शकतो आणि त्यामुळे येणार्या काळात अशीच वैश्विक महामारी येऊ शकते.
चीन आणि युरोप मध्ये डुक्कराचे मास भरपूर खाल्ले जाते त्यामुळे येथील शेतकरी या डुक्कराची
शेती (पालन) करतो. हा एक मोठा व्यवसाय आहे
त्यामुळेच सध्याचा घडिळा या उद्योगात असणारे लाखो लोकाना याची बाधा झाली आहे. अंगदुखी, मळमळ, खोखला अशी काहीशी लक्षणे
आढळून आली आहेत.
२००९ साली आलेला स्वाइन फ्लूने ११ ते २१% लोकसंखेला बाधा केली
आणि सीडीसीच्या अहवाला नुसार आजतागायत ४ ते ५ लाख लोक मरण पावले आहेत. सुदैवाने टॅमि
फ्लू नावाचे औषध आणि लस लवकर विकसित झाली त्यामुळे आज हा साथीचा आजार आटोक्यात आला
आहे याच विषाणूचे जी४-ईए-एच१एन१ सुधारित रूप आल्याने या विषाणूशी लढण्यासाठी मानवाचा
शरीरात अॅंटीबोडीज असतील असे आपणास वाटू शकते पण शस्त्र्ज्ञान्च्या म्हणन्यानुसार हा
विषाणू सुधारित असल्यामूळे मानवी शरीरकडे कसलीही अॅंटी बोडीस नाहीत आणि म्हणून शास्त्रज्ञांनी
या विषाणू च्या बाबतीत प्रकर्षाने जगाचे लक्ष केन्द्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.
असे जरी असले तरी चीनि कम्यूनिस्ट सरकार सर्व काही नियंत्रणाखाली असल्यासारखे वागत
आहे. कोरोना विषाणू बाबतीत चीन ने जे काही केले तसेच काहीसे या विषाणू च्या सदर्भात
करत आहे असे केल्यास येणार्या काळात नक्कीच आणखीन एक वैश्विक महामारीस सामोरे जावे
लागेल.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com/
Comments
Post a Comment