Corona Series Part 86
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना आणि आयसीएमआरचे परिक्षण
कोरोना विषाणूचे काय परिणाम होतील किती दिवस बाधा राहील असे
बरेच परिक्षण वेगवेगळ्या संस्थेमार्फत होत असते. असेच परिक्षण आयसीएमआरने १४ जुन रोजी
जाहीर केले यांचा अभ्यासानुसार १५ नोव्हेंबरपर्यन्त भारतामध्ये कोरोनाचा आलेख सर्वोच
बिन्दु गाठेल आणि तेव्हा भारतामध्ये आयसीयू, आयसोलेशन बेड आणि वेंटीलेटरची कमतरता भासेल. २५ मार्च ते ३१ मे मध्ये कडक लॉकडाउनमुळे
संक्रमण दर ६९ ते ९७% कमी झाला आहे आणि मे मध्ये येणारा सर्वोच बिन्दु १५ नोव्हेंबरपर्यन्त
पुढे ढकलला गेला. जर हा सर्वोच बिन्दु मे मध्ये आला असता तर मृत्यूचे प्रमाण प्रचंड
वाढले असते. लॉकडाउनच्या काळात आरोग्य विभागाला कोरोनाशी सामना करण्यासाठी कही प्रमाणात
वेळ मिळाला आहे. आणि त्यामुळे आरोग्य विभागाचे मनोबल वाढून एक अंदाज आला आहे. भारताच्या
जीपीडीच्या ६.२% ईतकी रक्कम आरोग्य विभागामार्फत कोरोना विषाणूवर उपाय करण्यासाठी लागू
शकतात. सरकारी दवाखान्यात आज २१,४९४ वेंटीलेटरची आहेत
यांची संख्या वाढवण्यासाठी ६०,८८४ वेंटीलेटरची खरेदी
प्रक्रिया राबबण्यात आली आहे.
मागील काही दिवस रोज जवळपास १०.००० रुग्ण संपूर्ण भारतात बाधित
होत आहेत आणि आपण पहिल्या ४ बाधित देशाचा यादीत आलो आहोत. अशीच संख्या वाढू लागली तर
आरोग्य विभागामार्फत केलेल्या उपाय योजना जसे आयसीयू बेड ४.५ महिन्यात, आयसोलेशन बेड ५.५ महिन्यात भरून जातील आणि वेंटीलेटर ४
महिन्यात संपून जातील.
आयसीएमआरचे हे परीक्षण ईतर संस्थे मार्फत तपासले गेले नाही आहे
त्यामुळे सर्वच गोष्टी योग्य असतील असे जरी नसले तरीही आरोग्य विभागाला आजूनही बळकटी
देणे गरजेचे आहे हे समजून येत आहे तसेच आरोग्य खात्यामधील कर्मचार्यांवर अजून अधिक
तान पडणार आहे. त्यामुळे खचून न जाता अजून जोमाने काम कारावे लागणार आहे. तसेच भारातमध्ये
सध्या झोन नुसार नियम आणि अनलॉकिंग सुरू झाले आहे त्यामुळे असे परीक्षण छोट्या छोट्या
क्षेत्रा नुसार होणे जास्त फायद्याचे ठरेले असते.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Thanks sirr 👍 nice information sir 👍👍
ReplyDeleteThanks for blog
ReplyDelete