Corona Series Part 85
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना दिल्ली, आणि
मृत्युदर
भाग 44 मध्ये कोरोनाच्या
मृत्युदरा बाबतीत विश्लेषण केले आहे या मध्ये जागतिक पटलावर होणार्या मृत्यूचे आकडे
पाहिले. दिल्ली मध्ये मात्र कोरोना विषाणूमुळे नेमके किती मृत्यू होत आहे याची संख्या
शोधून काढने लस शोधून काढण्यापेक्षा कठीण काम झाले आहे. जगात सगळीकडे जवळपास एकसारखेच
मृत्यूची कारणे समोर येत आहेत आणि आपल्या पेक्षा छोटे मोठे देश कोरोनाशी सामना करत
जगाकडून वाहवाह मिळवत आहेत परंतु आपल्या देशात मात्र सावळा गोंधळ सुरूच आहे. देशाची
राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने होणारे मृतांच्या संख्या नेमकी किती आहे यामध्ये गोंधळ
आहे. आता मृत नागरिकांची संख्या महत्वाची का असते कारण त्यावरून विषाणू बाबतीत माहीत
होऊ शकते नेमके पुढे काय केले पाहिजे त्याचे नियोजन करता येते. दिल्ली सरकारनुसार १२७१
रुग्ण आज पर्यन्त दगावले आहेत. दिल्ली मध्ये ईस्ट, नॉर्थ सेंट्रल,
साऊथ अश्या ३ महानगर पालिका आहेत यांचा
नुसार मृताची संख्या वेगळी सांगितली जाते. दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार मार्च मध्ये २ एप्रिल
मध्ये ५७ मे ४१४ आणि जुन १०पर्यन्त ६१२ असे १०८५ रुग्ण दगावले आहेत परंतु तीन महानगरपालिकाच्या
आकडेवारी नुसार ही संख्या २०९८ ईतकी आहे. नेमके असे का होते आहे हे पाहणे महंत्वाचे
आहे. अमेरिकेमध्ये नेमका मृत्यू कश्यामुळे झाला हे तेथील तज्ञ डॉक्टरची एक टीम ठरवते
जर व्यक्ति कोरोनाबाधित असेल आणि हृदयविकाराने मृत्यू झाला तर मृत्यू ची संख्या कोरोनाच्या
संख्येमध्ये धरली जात नाही. ईटली मध्ये सगळे मृत्यू कोरोंनाच्या मृत्यू मध्ये धरले
जातात. दिल्लीमध्ये मध्ये मृत्यूची संख्या ठरवण्यासाठी २८ एप्रिलला दिल्ली सरकार कडून
डॉ अशोक कुमार, डॉ विकास डोगरा आणि डॉ आर दास यांची त्रि सदसीय समिती नेमण्यात आली आहे. दररोज
संध्याकाळी ५ वाजता रुग्णालयातील नोडल अधिकारी या समितीला संख्या कळवतो. नेमका मृत्यू
कशामुळे झाला हे ठरवण्याचा आधिकार त्या त्या रुग्णालयातील डॉक्टर आणि नोडल अधिकारी
ठरवतात. रुग्णालयाला संख्या कळवण्याचे बंधन आहे जर संख्या आली नाही तर दुसर्या दिवशी
त्याचे कारण द्यावे लागते. अशी स्टँडर्स ऑपरेटिंग प्रक्रिया आहे. असे असूनही मृत्यूच्या
संखे मध्ये तफावत दिसत आहे.
नेमका घोळ ९ मे पासून सुरू झाला सरकारी आकडा ६६ असून महानगरपालिका
आणि रुग्णालयातून संख्या ११६ आली. म्हणून दिल्लीचे प्रमुख सचीव विजय देव म्हणाले सरकारला
मृत्युचा आकडा कळवळा जात नाही आहे. म्हणून आरोग्य सचीवा पद्मिनी सिंगला यांनी महानगरपालिकेला
पत्र देऊन दहन आणि पुरलेलल्या रुग्णाची संख्या मागवण्यात आली. १६ मे रोजी ही संख्या
४२६ आली आणि १७ मे पर्यन्त सरकारी आकडा १९४ होता. याचे दोन अर्थ होटाटा एक तर सरकारला
संख्या नागरिकांना कळवायची नाही किंवा महानगरपालिका कडून संख्या जास्त कळवली जात आहे.
हा मुद्दा उच्च न्यायालयत गेला आणि कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला.
आज हा मुद्दा चर्चेत घेण्याचे कारण की जगभरात कोरोनाशी लढा देताना
योग्य शास्त्रीय माहिती मिळवून त्याचा वर अभ्यास केला जात आहे. आणि राजधानी मध्ये संखेचा
खेळ करत बसलो आहे. भारता मध्ये कोरोना येऊन संक्रमण कमी झाले तरीही विषयचे महत्व का
समजत नाही. आज सपूर्ण भारत एकत्र येऊन लढा देण्याची वेळ असताना वादाचे मुद्दे बाजूला
करणे महत्वाचे आहे असे झाले नाही तर येणार्या काळात भारत प्रथम क्रमांकाचा देश बनेल
आणि कोरोनाचा आश्रय दीर्घकाळ भारतात राहील.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍
ReplyDeleteGret msg
ReplyDelete