Skip to main content

Corona Series Part 79 : कोरोना, आणि शस्त्रक्रिया

Corona Series Part 79

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, आणि शस्त्रक्रिया

मागील काही दिवसापासून मानवी शरीराचा कोरोना हा एकमेव शत्रू आहे असे काहीसे चिंताजनक  वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना सीझन चालू झाल्यापासून मोठ मोठे हॉस्पिटल सुधा रिकामी दिसू लागली होती. कधी कधी वाटते कोरोनाआधी रुग्णालयात गरज नसतांनाचा औषध उपचार करत होते की काय! परंतु असे नसून मेडिकल हेल्थ आणि फॅमिली वेलफेर नुसार अतिआवश्यक नसलेले सारे औषध उपचार आणि शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेणायात आला होता. अतिआवश्यक नसलेल्या म्हणजे नक्की कोणत्या प्लॅस्टिक सर्जरी, प्रथम टप्प्यात असणार्‍या कर्करोग, पित्ताशयातील खडे काढणे, मुतखडा, हर्निया, डोळ्याचा अश्या ठरवून केल्या जाणार्‍या ईत्यादी शस्त्रक्रिया. स्क्रोल इन या वेबसाइटच्या परीक्षणानुसार मार्च महिन्यापासून आज पर्यन्त ५लाख शस्त्रक्रिया या लांबणीवर टाकण्याता आल्या दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील ५१ मेडिकल कॉलेज मध्ये देखील तातडीच्या शस्त्रक्रिया सोडून ईतर शस्त्रक्रिया थांबण्यात आल्या किंबहुना, सपूर्ण भारतता हेच चित्र होते. या शस्त्रक्रिया का लांबणीवर टाकण्यात आल्या, त्याचा नागरिकांवर परिणाम काय झाला हा एक चर्चेचा भाग आहे.

 

ब्रिटिश जर्नल ऑफ सर्जरी मध्ये १८ मे रोजी प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ५,८५,००० अतिआवश्यक नसलेल्या अंदाजे ४८७२८प्रती आठवडा अश्या शस्त्रक्रिया थाबवल्या याचे कारण म्हणजे कोरोना विषाणू असले तरी अजून बरीच कारणे आहेत शासकीय रुग्णालय आणि सर्व कर्मचारी कोरोना विषाणू रोखन्याच्या मोहिमेवर होते तसेच सर्व वैद्यकीय पायाभूत सुविधा देखिल याचा यंत्रणेत आहेत यामुळे लसीकरणा मोहीम सुधा रखडली होती. तसेच एरोसोल हे एक महत्वाचे कारण आहे कारण लप्रोस्कोपी, एंडोस्कोपी सारख्या शस्त्रक्रियेमध्ये एरोसोलचे प्रमाण अधिक असते त्यामुळे वेगवेगळ्या विषाणूचे संक्रमण होण्याची संधी भरपूर असते. लॉकडाउनच्या काळात कोरोनासाठी लागणारे पीपीई किटची उपलब्धता, भयगंड अश्यागोष्टी मुळे खाजगी रुग्णालयात देखील शस्त्रक्रिया झाल्या नाहीत. अतिआवशक्यता जरी नसली तरीही डॉक्टर आणि रुग्ण यांचा संमतीने ठरवलेल्या वेळी शस्त्रक्रिया होणे हे देखील खूप महत्वाचे आहे. कारण रुग्णाची शस्त्रक्रिया करून घेण्याची मानसिकता बनलेली असते तेव्हा शस्त्रक्रिया झाल्यास अधिक प्रभावी आणि कमी त्रासदायक होऊ शकते. जर्नल ऑफ व्हिसेराल सर्जरी मधील संशोधनामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये या विषयावर चर्चा केली आहे. काही उदाहरणे पाहू प्रथम टप्प्यातील कर्करोग हा प्राथमिक अवस्थेत असताना त्याचा समूळ नाश केला तर रुग्णाचे पुढील आयुष्य कमी त्रासाचे होऊ शकते. स्तनाचा कर्करोगावर औषध उपचार करीत असताना त्याचे पुनर्बांधनी मध्ये वेळ दवडून चालत नाही. त्याचबरोबर cleft palate, craniofacial disorder, gender reassignment, appendix, अश्या विविध शस्त्रक्रिया ठरवून करणार्‍या असल्या तरीही त्याचे महत्वकमी होत नाही वेळ असताना केल्या गेल्या नाहीत तर जिवावर बेतू शकतात. प्राथमिक अवस्थेत कर्करोगाचे निराकरण करणे किंवा धमण्या मध्ये असणारे अडथळे वेळीच उपाययोजना केली नाही तर काय होऊ शकते याची कल्पना आपल्या सर्वांना असेलच. Indian institute of public health यांचा अंदाजनुसार थकीत राहिलेल्या शस्त्रक्रिया करण्यासाठी लॉकडाउन नंतर रोज २०% अधिक वेळ आणि डॉक्टर, कर्मचारी लागणार आहेत.  यामधून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेमध्ये अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जन यांनी १० महत्वाच्या गोष्टी सुचवल्या आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पातलीवर निर्णय घेणे गरजेचे आहे. आसपासच्या भागात असणारी रुग्णसंख्या, वैद्यकीय सेवा, संक्रमनाचे प्रमाण या सार्‍या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. रुग्णालयातील कर्मचारी ईतर रुग्ण डॉक्टरया सर्वांची तपासणी करणे. रुग्णाचे प्राधान्य त्याचे आरोग्य आणि असणारा आजार यावरून ठरवले पाहिजे. Pre-operative, immediate pre-oprative, intra-oprative आणि पोस्ट-oprative या सर्वच ठिकाणी प्रकर्षाने काळजी घेणे गरजेचे आहे परंतु, हे सर्व भारतामध्ये किती शक्य आहे अमेरिकेतील मार्गदर्शक तत्वे भारतात लावून चालणार नाहीत म्हणून आयसीएमआर ने या शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शक तत्वे आखून देणे गरजेचे आहे.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...