Corona Series Part 36
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, आणि प्रतिजैविक (Antibiotics)
शास्त्राचा
सिद्धांतानुसार जगतात स्थिर असे काही नाही, प्रत्येक सजिव,
निर्जीव वस्तु मानवी शरीर असो वा
जिवाणू, विषाणू असो काही ना काही बदल त्यांच्यात
होतच असतात. या विषाणू पासून होणारी बाधा टाळण्याकरिता विविध प्रतिजैविकाचा वापर
केला जातो आणि झालेली बाधा कमी होऊन आपल्याला बरे वाटते. परंतु सततच्या प्रतिजैविकाचा
वापरमुळे या विषाणू /जिवाणू मध्ये Mutagenic बदल
घडू लागतात. अश्यावेळी पुन्हा बाधा झाल्यास रूग्णाला
प्रतिजैविकाची अधिक मात्रा द्यावी लागले. अधिक ताकतीची मात्र देण्याचे बरेचसे दुष्परिणाम
होऊ शकतात. आणि एक वेळ अशी येते की या प्रतिजैविकाचा वापर करून देखील या विषाणूची
रोकथाम करण शक्य होत नाही. कारण सततच्या प्रतिजैविकाचा वापरमुळे विषाणूमध्ये प्रतिजैविकाच्या
विरोधात प्रतिरोधक क्षमता तयार होते. एक सर्वे नुसार वर्षाला ७ लाख लोक अश्या
प्रतिरोधक क्षमता तयार झालल्याने मृत्यूमुखी पडतात. कोरोना विषाणूच्या या
महामारीत मध्ये लोकांचे जीव वाचण्यासाठी आपल्याला देखील जास्तीत जास्त प्रतिजैविकाचा
वापर करावा लागत आहे. त्यामुळे येणार्या काळात आज अस्तीत्वात असलेली प्रतिजैविके
निकामी होऊन विषाणूमध्ये प्रतिजैविकाच्या विरोधात प्रतिरोधक क्षमता तयार होण्याची भीती
निर्माण होत आहे. आपल्याला असे वाटेल, प्रतिरोधक क्षमता निर्माण झाली की आपण ही आजच्या प्रतिजैविकाची पुढील आवृत्ती
काढू म्हणजे अडचण दूर होईल. पण मित्रांनो ईथेच गडबड होते. कारण पुढील आवृत्ती शोधणं
हे वाटते तितके सोपे काम नाही. या मागचे शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करू.
विषाणूमध्ये
नैसर्गिक किवा genetic पद्धतीने प्रतिरोधक क्षमता तयार
होते. विरोधाचे देखील काही टप्पे आहेत. १] MDR : Multi Drug
Resistance २] XDR : Extencive Drug Resistance ३] TDR : Total Drug Resistance i.e Superbugs वैज्ञानिकांना याची कल्पना आधी
पासून असल्यामुळे आपल्या भात्या मधील सगळे बाण एकाच वेळी न वापरता काही बाण जपून
ठेवले होते, त्याला आपण Antibiotic of last Resort असे म्हणतो. परंतु कोरोना सारख्या
माहामारी किवा अन्य काही चुकीच्या गोष्टीमुळे म्हणजे आजच्या या गतिमान जगात
प्रत्येकाला लवकर बरे व्हावे असे वाटत असते त्यामुळे आपण साध्य आजाराला देखील
प्रतिजैविकाचे उच्च मात्र घेऊ लागलो आहोत त्यामुळे आपल्याकडील प्रतिजैविका सारखे
ब्रम्हास्त्र देखील निकामी होण्याची वेळ जवळ येऊ लागली आहे. आपणास माहीत आहे
ब्रम्हास्त्र मिळण्या साठी प्रदीर्घ अशी तपश्चर्य करावी लागली होती, त्याच प्रमाणे शास्त्रज्ञांना देखील एक प्रतिजैविक
तयार कारण्यासाठी १५ वर्षापेक्षा अधिकचा काळ आणि पैसा खर्च करावा लागतो. असे
करताना जर विषाणू mutate झालाच तर सारी मेहनत पाण्यात जाते
त्यामुळे विविध औषध कंपन्या देखील प्रतिजैविकी वरील R&D करणे पसंत करत नाहीत. मनुष्याकडे काही मर्यादित प्रतिजैविके शिल्लक आहेत.
एकदा जर ती सर्वच छोट्या छोट्या आजारांवर वापरुन सवयीची झालीत तर भविष्यात साधी
जखम झाली तरी त्या वरील प्रतिजैविक उपलब्ध नसेल आणि सेपटीक होऊन जीव गमवावा लागेल.
कोरोनाच्या
काळात काही प्रगत राष्ट्र चीन, फ्रांस मधील काही
संशोधक समूहाने या विषयावर संशोधन केले. The Lancet, Feri, Zhou.; et.al. १९१ कोरोना रुग्णावर अभ्यास केला
असता, असे लक्षात आले की कोरोनची बाधा
होऊन बरे झाल्यानंतर १५% लोकांना दूयम कोणत्या तरी विषाणू / जिवाणूची बाधा
होऊन ७ ते ८ % लोक मरण पावले आहेत. फ्रांस
मध्ये कोरोनाची बाधा झाल्यानंतर Aspergillus बुरशीची
बाधा रुग्णांना झाली होती. मागील वर्षी Science & Technology मधील एक रीपोर्ट नुसार यूरोपियन युनियन मधील
राष्ट्रामध्ये ३३,००० लोक त्यात ही ११,००० एकट्या ईटली मधील लोक अश्या प्रकारच्या प्रतिरोधक
क्षमतेच्या विकासमुळे मृत्यूमुखी पडली. (प्रतिरोधक क्षमतेच्या विकास म्हणजे एका
अर्थाने प्रतिजैविक निकामी होणे).
रोजच्या
जीवनातील उदाहरणे म्हणजे १) DDT एक काळचे नोबेल परितोषिक मिळवून देणारे रसायन. या कीटक नाशकामुळे आज मुंग्या
देखील मरत नाहीत. २)
गूळ तयार करत असताना एक काइल साठी काही ग्राम H२Sची पावडर घालायची असते परंतु रंग
पिवळा धमक येण्या करिता ग्रामच्या ठिकाणी किलो मध्ये हे रसायन वापरले जाते आणि
त्याचे दुष्परिणाम मानवी शरीरावर दिसतात. असे कितीतरी रसायने तन/ कीटक नाशके बाजारात
आहेत त्याचा तन / किटकावर परिणाम होत नाही, त्याच प्रमाणे औषधामद्धे खूप अशी प्रतिजैविके आहेत त्यांचा कोणत्याही
जिवाणू / विषाणू वरील प्रभाव निकामी झाला आहे.
वरील
सर्व घटनेतून बोध होतो की असणारे प्रतिजैविकांचा वापर योग्य ठिकाणी आणि मर्यादित
करणे गरजेचे आहे. कोरोना सारखा साथीच्या आजारामध्ये भयगंड निर्माण झाल्यामुळे
कोरोंनाची बाधा नसणार्यानमध्ये प्रतिजैविकेचा भरमसाठ वापर टाळणे गरजेचे आहे.
सामान्य सर्दी, खोखला, ताप यामध्ये संयम आणि सहनशीलता आणि डॉक्टरान मार्फत योग्य वैद्यकीय
मार्गदर्शन गरजेचे आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
Comments
Post a Comment