Corona Series Part 35
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, आणि आपत्कालीन प्रतिसाद निधी
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने
१.७० लाख करोड रुपयाचा मदत निधी देऊ केला आहे येणार्या काही दिवसात या मदत निधिची
रक्कम वाडण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात आरोग्य खात्या मार्फत कोरोनाशी दोन
हात करण्यासाठी भारतीय आपत्कालीन प्रतिसाद निधी आणि आरोग्य प्रणाली सज्जता असा १५,००० हजार करोड रुपयाचा निधी जाहीर झाला आहे. सदर निधी मधून कोरोनाशी लढण्यासाठी
लागणारे वैद्यकीय संसाधने, रुग्णालये ईत्यादी
गोष्टीसाठी खर्चीला जाणार आहे. मुळात २ टप्प्यामद्धे निधीचे वितरण केले जाईल. ७,७७४ करोड रुपये तत्काल दिले जाऊन उर्वरित रक्कम
येणार्या ४ वर्षामध्ये दिली जाईल. असे करण्याचे
कारण म्हणजे कोरोनाशी हा लढा दीर्घकाळ चालू राहणार आहे याची जाणीव केंद्राला
झाली आहे.
ज्या
प्रमाणे राष्ट्रीय पोलिओ, क्षय रोग निर्मूलन
कार्यक्रम राबवले जात आहेत त्या प्रमाणे ईथुन पुढे कोरोना निर्मूलन कार्यक्रम राबवावा
लागणार आहे. या कार्यक्रमा मार्फत फक्त कोरोनाच्या उपचारकरिता विशिष्ट
सर्वसोईनियुक्त कोरोना रुग्णालय (Isolation and ICU Bed), त्याच बरोबर सहाय्यक उपाययोजना करण्यासाठी लागणार्या प्रयोगशाळा, साथीच्या रोगावरील संशोधन ईत्यादी गोष्टींचा समावेश
करण्यात आला आहे. या अश्या उपक्रमातून देशाची वैद्यकीय क्षमतेला बळकटी आणायचा मूळ
उद्देश आहे. पहिल्या टप्प्यातील ७,७७४ करोड रुपये
मधील ३,००० करोड रुपये विविध राज्य आणि
केंद्रशाशीत प्रदेशाला पीपीई कीट, मास्क, कोरोनावरील औषधे, तपासणी कीट ईत्यादी माध्यमातून देऊ केल गेले आहेत. आपणास कल्पन्ना असेल पीपीई
कीट, तपासणी कीट ईत्यादी एकदाच वापरली जातात, आज रोजी सर्वात जास्त पीपीई कीट महाराष्ट्र, तमिळनाडू,
गुजरात,दिल्ली या राज्याकडे आहेत परंतु सर्वात
जास्त रुग्ण ही याच राज्यात असल्याने अजूनही पीपीई आणि तपासणी कीटची मागणी होत
राहणार आहे. Ventilators,
ICU bedची
संख्या महाराष्ट्रमध्ये अनुक्रमे ४,३८३, २९८६-इतकी अत्यल्प आहे. त्यामुळे या सुविधा
पुरावण्या करिता सरकारला नव्याने खरेदी करणे गरजेचे झाले आहे. केंद्रा कडून
आलेल्या निधी आणि राज्य सरकार कडे असणारा स्वतःचा निधी वापरुन दोन्ही सरकार सर्व
सामान्या जनतेला सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अश्या प्रकारचे उपक्रम आज कोरोनाचा
समूळ नाश करू शकले नाहीत तरी त्याच्या फैलाव होण्याला मज्जाव नक्कीच करीत आहेत.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
Comments
Post a Comment