Corona Series Part 25
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना
विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोना, आणि पूल चाचणीचे सूत्र
सध्या कोरोना पासून बचावकरण्यासाठी लॉकडाउन हा एकच
प्रतिबंधात्मक उपाय जगभरात वापरला जातोय. कोरोनाच निदान लवकरात लवकर लावायचे
असल्यास लॉकडाउनच्या काळात जास्तीत जास्त
नागरिकांच्या चाचण्या करन गरजेचं आहे. म्हणजे जे बाधित असतील त्यांचा उपचार करता
येईल लक्षणे नसणारे संशयित आहेत त्यांना quarantine किवा isolation करता
येईल. असे घडले तर लॉकडाउनचा एक उद्देश पूर्ण होऊ शकतो व आपण हळू हळू रोजच्या
जीवनाकडे वाटचाल करू. संपूर्ण जगात हेच एक सूत्र कामास आले आणि म्हणूनच कमी वेळेत
कमी खर्चात जास्तीत जास्त काम कसे करता येईल असा विचार करत नवीन नवीन प्रयोग चालू
केले आहेत. त्यातीलच एक प्रयोग म्हणजे पूल टेस्टिंग फॉर्म्युला.
भारत वैद्यकीय साधना करिता आज ही परावलंबी
राहिला आहे. हे वेंटीलेटर, Rapitd Test Kit,
ईत्यादी साधने बाहेरील देशातून आयात केली जातता परंतु आज सर्वत्रच वैद्यकीय
साधनाची मागणी वाढल्यामुळे पुढारलेल्या देशातून आपल्याला ही साधने गरजेच्या वेळी, योग्य दर्जा असणारे साधने त्वरित मिळतील की नाही
सांगता येत नाही. भारत सरकारच्याच्या परराष्ट्र धोरणामुळे ही साधने उपलब्ध होऊ
लागली आहेत. अश्या साधनाचा वापर योग्य करणेकरिता काही सूत्र आखली गेली आहेत.
भारतात 130 कोटी लोकसंखेत आज पर्यन्त 2
लाख कोरोनाचा तपासण्या पूर्ण केल्या आहे, टक्केवारीच्या भाषेत मांडायच झाल तर 0.015% इतका आहे. हा आकडा पहिलं
तर आपल्या लक्षात येईल आपण कुठे उभे आहोत. झालेल्या चाचणीत आज 10,000 रुग्ण बाधित आढळले आहेत. लॉकडाउन च्या काळात जास्तीत जास्त
चाचण्या झाली तर रुग्णाचा शोध लवकर लागू शकतो भारताचे देखील हेच नियोजन होते परंतु
लॉक डाउन 1 मध्ये तरी अपेक्षित इतक्या चाचण्या झाल्या नाहीत. ICMR च्या आकडेवारी नुसार रोज 15-18 हजार चाचण्या होत
आहे. ह्या वेगाने आपण पुढे सरकत राहिलो तर आपण आपले लक्ष सध्या करू शकणार नाही
दिवसात 1 लाख चाचण्या अपेक्षित आहेत. प्रतेक व्यतिनिहाय चाचणी करणे त्या साठी
लागणारा वेळ, पैसाचे सगळे गणित न सुटणारे आहे.
हेच गणित सोडवन्यासाठी काही अंशी सोपे करणेकरिता पूल टेस्टिंग चे सूत्र वापरले जाते.
सदर चाचणी व्यक्तिनिहाय न करता व्यक्तींच्या समुहा नुसार केल जाते. कसे ते एक
उदाहरणतून समजून घेऊया.
समझा 100 व्यक्तीची चाचणी करण्यासाठी
आपणास 100 किट तर लागणारच आणि वेळ व धन देखील खर्ची करावे लागेल. आता
आपण ह्याच 100 व्यक्तींना 5 -5 च्या समूहात विभागणी करू तर 20 समूह होतील
आता प्रत्येक समूहातील कोरोंनाची लक्षणे दाखवणारी प्रवास करून आलेले अश्या प्रतेक 1
व्यक्तिची चाचणी केली तर 20 किट लागतील आणि वेळ ही वाचेल. असा प्रयोग प्रथम
अंडमान निकोबर मध्ये करण्यात आला त्यांनी 100 लोकांच्या मागे 25 किट वापरले. इस्राइल
मध्ये देखील अश्याच प्रकारे 64 लोकांच्या मागे 1 चाचणी केली जात आहे. भारतात
मात्र 5 व्यक्तींचा समूह करायचा ठरले आहे (1 कुटुंबातील असा व्यक्ति जो सतत
फिरतीवर आहे लोकांच्या संपर्कात येत आहे अश्या लोकांना प्राथमिकता देऊन चाचणी केली
जाईल जर त्यातील कोण पॉजिटिव असेल तर मात्र सर्वाची तपासणी केली जाईल). अश्याप्रकारच्या
चाचणीचे हे सूत्र 100% उपयुक्त जरी नसले तरी कमी वेळेत जास्तीतजास्ती लोकांच्या
चाचण्या करण्यात येतील. 15-एप्रिल
ते 20-एप्रिल पर्यन्त भारतात जास्तीत जास्त चाचण्याकेल्या गेल्या तर कुठे लॉकडाउन
शिथिल करता येईल हा निर्णय घेणायसाठी मदत होऊ शकते. आता ह्या सुत्राच्या काही
मर्यादा पाहू
आज पर्यन्त महाराष्ट्रामध्ये 41,071 चाचण्या घेतल्या त्यात 2455 रुग्ण बाधित आहेत म्हणजेच
तपासणीच्या 7.5% रुग्ण सापडले आहेत. राजस्थान, केरळमध्ये अनुक्रमे 31,804, 15,683 चाचण्या घेतल्या त्यात 943, 378 रुग्ण बाधित आहेत. (3% आणि 2%). आता
महाराष्ट्रामध्ये
पूल टेस्टिंग चे सूत्र आज पर्यन्त वापरले नाही कारण ICMR च्या मार्गदर्शकतत्वा नुसार आतापर्यंत झालेल्या तपासणीच्या 2% पेक्षा
कमी रुग्ण जिथे आहेत तिथे हे सूत्र वापरण्यास योग्य आहे. जिथे आतापर्यंत झालेल्या
तपासणीच्या 2% ते 5% रुग्ण आहेत तिथे हे सूत्र फक्त कोरोना रुग्णाच्या
संपर्कात असणार्या सर्व स्टाफ, नातेवाईक ईत्यादी
लोकांकरीता वापरण्याची शक्यता आहे. आणि जिथे आतापर्यंत झालेल्या तपासणीच्या 5% पेक्षा
आधिक रुग्ण अधले आहेत तिथे हे सूत्र वापरता येणार नाही आहे आणि म्हणूनच
महाराष्ट्रा, राजस्थान, केरळमध्ये आज पर्यन्त हे तपासणीचे सूत्र वापरले गेले नाही. वरील सर्व माहीत
ही सांखिकी आणि गणिती तज्ञच्या (Stastistical Officer) मदतीने मांडता येते त्यामुळे कमी वेळेत जास्त काम करण्याचा अश्या नवीन
सकल्पना वरात येतात. 3 मै पर्यन्त वाढलेल्या लॉकडाउनचा काळात भारत सरकारने
आपेक्षित इतक्या चाचणी पूर्ण व्हाव्यात ही आपेक्षा.
प्रा
डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
Comments
Post a Comment