Corona Series Part 96
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना आणि दिल्ली
मार्च
एप्रिल मध्ये युरोप,
चीन, अमेरिका किंबांहून सर्व ठिकाणी कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली असताना
भारतात लॉकडाउनची झालेली कडक अमलबजाबवणी आणि त्याच बरोबर कमी प्रमानात झालेल्या तपासण्या
या दोन्हीही कारणामुळे बाधितांची संख्या कमी दिसून येत होती आणि म्हणूनच जागतिक क्रमवारीत
भारत शेवटी कुठे तरी दिसत होता. पण हळू हळू लॉकडाउनमध्ये आलेली शिथिलता आणि तपासनीचा
वाढता आलेख यामुळे भारतता संक्रमितांची संख्या अतिशय वेगाने वाढत असलेली आपण पाहत आहोत.
देशात
२० जूननंतर सलग सहाव्या दिवशी १४,००० पेक्षा जास्त कोरोना विषाणूचे रुग्ण नोंदले गेले आहेत. २१ जून ला १५,४१३, २२ जून (१४,८२१), २३ जून (१४,९३३) आणि २४ जून (१५,९६८)
होते. २० जूनपासून एकूण ९२,५७३
आणि या महिन्यात १ जूनपासून २.८२ लाख रुग्ण आढळले आहेत.
देशाची
राजधानी दिल्ली मध्ये गेल्या काही दिसापासून लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. दिल्लीत
सध्या ७०,००० पेक्षाजास्त कोरोनाग्रस्त प्रकरणे
आहेत, त्यापैकी जवळजवळ ४०,००० प्रकरणे गेल्या दोन आठवड्यांत सापडली आहेत. दररोज
अंदाजे ३ ते ४ हजार रुग्ण संक्रमित सापडत आहेत. अपेक्षेप्रमाणे दिल्लीने बुधवारी
मुंबईवर मात करून देशातील कोरोनाव्हायरस संक्रमितांच्या यादीत अव्व्ल स्थान मिळवले.
सुरवातीला दिल्ली मध्ये ५ ते ७ हजार तपासण्यामधून १५०० पर्यन्त संक्रमितानची संख्या
येत होती पण सध्या १७ ते २०००० हजार तपासणी होऊ लागली आहे आणि त्यातून ३ हजारहून अधिक
बाधित रुग्ण आढळून येत आहेत. रॅपिड अॅंटीबॉडी टेस्टला आईसीएमआर कडून मान्यत मिळाल्यामुळे
तपासणीचा आकडा वाढवता आला. पण ही परिस्थिती कायमची राहण्याची शक्यता नाही, दिल्लीनेमध्ये ही रोगनिदान लवकर शोधून काढण्याचे आणि संसर्ग
कमी करण्यासाठी घरोघरी तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई काही प्रमाणात हा
सराव करत आहे आणि त्याला काही प्रमाणात यश मिळाले आहे. घरोघरी नजर ठेवून लवकर संभाव्य
संसर्ग ओळखण्यास मदत होते आणि या सरावामुळे दिल्लीतील केसेसची वाढ मंदावण्याची
शक्यता आहे.सध्या आलेख चडता असला तरी तपासणीचा वेग वाढत गेला की बाधीतांचा आलेख हळू
हळू खाली यायला लागेल.
दुसरीकडे मुंबई दररोज ४,००० ते ४५००फारच मर्यादित चाचण्या घेत आहे. पण मुंबईही आता एक लाख रॅपिड
अॅंटिजेन किट मागवत आहे. या चाचण्या ंचा वापर सुरू झाला की मुंबईच्या केस
नंबरमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई ने आपल्या चाचणीचे जाळे अगदी निवडक केले
आहे, फक्त संसर्ग झालेल्या ंना आणि
ज्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे अशाची तपासणी करण्याचे लक्ष्य आहे अशी टीका आधीच
झाली आहे. मुंबईत प्रत्यक्ष केसेसची संख्या खूप मोठी असू शकते, पण चाचण्या कमी असल्याने ते सापडले नाही.
दिल्ली मुंबई सारख्या प्रमुख शहरामधून सहजासहजी कोरोना हटणार
नाही पण ही शहरे देशाची आर्थिक केंद्रे आहेत त्यामुळे आज ना उद्या सर्व गोष्टी पूर्वा
पदावर आणाव्या लागतील हे करत असताना प्रत्येक व्यक्ति ने स्वतहून काळजी घेणे आत्यात
गरजेचे आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Thanks sirr 👍 nice information sir 👍👍
ReplyDeleteVery good information sir..👍👍👍
ReplyDelete