Corona Series Part 91
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना आणि नोकरी
मार्च महिना भारतामध्ये आर्थिक वर्ष समाप्तीचा महिना लहान, मोठे व्यापारी कर भरण्यात तर नोकरदार मूल्यांकनचा
फॉर्म भरण्यात गुंग असतात जेणे करून केलेल्या कामाचे मूल्यांकन होऊन पगार वाढ
मिळेल. कोरोनाच्या महामारी आली आणि सगळं गणितच बिघडून गेले. पगार वाढ सोडाच आहे ही
नोकरी राहते की जाते अशी अवस्था माध्यम वर्गीय लोकांची झाली आहे. व्यापारी कर्जाचे
हफ्ते कसे फेडू याचा विचार करत डोक्याला हात लावून बसला आहे. शेतकरी देखील
पिकलेल्या मालाल किंमत नसल्यामुळे कवडी मोल विकून संसाराचा रहाट गाडा चालवत आहे.
येणार्या पावसाळ्यात पुराचा धोका समोर दिसत आहे. एकूणच सर्वच वर्गाच्या मनात चिंता
घर करून बसली आहे. चिंता करण्यासर्खा विषय आहेच.
साधारणपाने 1 आठवड्या पूर्वी इंडियन एक्सप्रेस दैनिका मध्ये
कोणत्या नोकर्या, कुणाच्या नोकर्या (स्त्री, पुरुष,
आणि जात) किती लोक बेरोजगार होणार या आधारावर एक विषय मांडला होता. आज या आर्टिकल मधील
काही भागावार आपण थोडी चर्चा करूया. Center for Monitoring Indian Economy सारख्या खाजगी संस्था Consumer Pyramid Household Survey च्या माध्यमातून सर्वेक्षण चा एक नमुना
करण्यात आला. सपूर्ण भारततमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले नसले तरीही एक नमूना
जो मांडला आहे त्याता चिंताजनक चित्रा समोर येत.
मार्च २०१९ ते मार्च २० भारतामध्ये एकूण ४०करोड व्यक्तिनकडे
खाजगी, सरकारी, कंत्राटी, अश्या प्रकारच्या नोकरी होती. आज मार्च२० लॉकडाउन नंतर ३०% नोकर्यांवर
गंडातर आले आहे. केलेल्या सर्वेक्षणनुसार २८ करोड नागरिक नोकरी करत आहेत म्हणजे
जवळपास १२ करोड लोकांचा उदरनिर्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. प्रामुख्याने
रोजनदारी, हमाली, तसिका तत्वावरील कामगारांची नोकरीवर सर्वात जास्त
आघात झाला आहे ९ करोड नागरिक या वर्गात आहे ज्यांचाकडे आज कोणत्याही प्रकारचा उत्पन्नाचा
स्रोत नाही. लहान उद्योजक आणि त्यांचा कामगार समूह असे १.८२ करोड आणि पगारी नोकरदार
कंत्राटी,
आंशिक कायमस्वरूपी
असे १.७८करोड नागरिकांची नोकरी गेली आहे. विशेष म्हणजे
या मध्ये ग्रामीण महिला आणि दलित वर्गातील लोकांचा नोकर्या अधिक गेल्या आहेत असे निरीक्षण
या सर्वेक्षण करणार्या कंपनीला मिळाले आहे. काही वेळेस असे दिसून आले आहे नोकरी अशी आहे जिथे सर्वात जास्त
कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती आहे जसे की सफाई, आशा वर्कर ईत्यादी. कोरोनाचे संकट दूर झाले तरीही पुन्हा ४० करोडची संख्या ओलांडणे
हे खरे मोठे आव्हान आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे नोकर्या आहेत त्यांना त्या वाचवन्यासाठी
आणि ज्यांचा नोकर्या गेल्या त्यांना त्या पुन्हा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयन्त करावे
लागतील.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍
ReplyDeleteThanks for sharing
ReplyDelete